शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये समर्पणाची भावना असावी

By admin | Updated: January 25, 2015 00:51 IST

विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, ज्ञान, पे्रमासह समर्पण आणि त्यागाची भावना असावी, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे केले.

संबित पात्रा यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय छात्र संसदेचा समारोपनागपूर : विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, ज्ञान, पे्रमासह समर्पण आणि त्यागाची भावना असावी, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे केले. रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनच्यावतीने सीआरपीएफ गेटसमोरील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी कॉलेजच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या ‘राष्ट्रीय छात्र संसदे’च्या समारोपीय दिनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ‘क्वालिटी बेस एज्युकेशन टू बिल्ट द नेशन’ हा चर्चासत्राचा विषय होता. मंचावर जी.एच. रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, मोटिव्हेशनल ट्रेनर उषी मोहनदास, विजय सिन्हा आणि प्रदीप चोपडा होते. संबित पात्रा यांनी सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी भगवान कृष्णासारखे तेजस्वी व मनस्वी व्हावे. सतत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रदीप चोपडा म्हणाले की, नवनवीन साईटचा शिक्षणावर सकारात्मक परिणाम झाला आहे. रिसर्च पेपर आणि विविध कोर्सची माहिती तात्काळ मिळते, शिवाय घरबसल्या विभिन्न भाषाही शिकता येतात. पुस्तक आणि टॅब दोन्ही उपयुक्त असले तरीही पुस्तकाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. उषी मोहनदास यांनी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध विषय शिकविले जावेत. विजय सिन्हा यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. मीडियाची भूमिका महत्त्वपूर्णतिसऱ्या सत्रात ‘मीडिया ए गेम चेंजर’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, फिल्ममेकर अशोक पंडित, अशोक लुल्ला आणि परशुराम या वक्त्यांनी बाजू मांडली. अशोक पंडित हे काश्मीरचे विस्थापित असून त्यांचा या विषयाचा गाढा अभ्यास आहे. प्रकाश दुबे यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची बाजू मांडली. प्रिंट मीडियाने नैतिकता टिकवून ठेवावी. परशुराम यांनी इराक देशात बराच काळ वास्तव्य केले आहे. मीडियाच्या भूमिकेचा फटका इराकला बसला आहे. अशोक लुल्ला यांनी सोशल मीडियाचा गेम चेंजर म्हणून उपयोग केला जाऊ शकतो, असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी यांनी दोन दिवसात विविध विषयावर नामांकित वक्त्यांनी मांडलेल्या मतांवर भाष्य केले. तिसऱ्या ‘राष्ट्रीय छात्र संसदे’चे आयोजन पुढील वर्षी २२ आणि २३ जानेवारीला होणार आहे. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर डॉ. प्रा. अमिना वाली यांनी आभार मानले. तिन्ही सत्रात जी.एच. रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक डॉ. ओ.एस. बिहारे, समूह संचालक (एमबीए विभाग) डॉ. रवींद्र अहेर, जी.एच. रायसोनी लॉ स्कूलचे प्राचार्य डॉ. जयंत एल. अपराजित व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)