शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

पावसामुळे कळमन्यात लाखोंचे धान्य भिजले; शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 15:48 IST

समिती शेतकऱ्यांच्या सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटनेने आला आहे.

ठळक मुद्देबाजार समितीतर्फे सुरक्षेची व्यवस्था नाही; शेतकऱ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष

नागपूर : कळमन्यात वर्षभरात जवळपास २० ते २२ वेळा अवकाळी पावसामुळे खुल्या जागेतील धान्य भिजण्याच्या घटना घडतात आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. त्यानंतरही कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना जाग येत नाही. खुल्या जागेत तात्पुरती शेड उभारण्याची ३५ वर्षांपासून करण्यात येणारी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. समिती शेतकऱ्यांच्या सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटनेने आला आहे.

बाजारात धान्याची आवक कमी असल्यामुळे मध्यरात्री जवळपास २ हजार धान्यांची पोती भिजली. हा अवकाळी पाऊस १५ दिवसांपूर्वी आला असता तर शेतकऱ्यांची जवळपास २५ हजार पोती भिजली असती. आता १५ दिवसांवर पेरणी आल्यामुळे शेतकऱ्यांकडून बाजारात धान्याची कमी आवक होत आहे. मात्र, हीच घटना १५ दिवसांपूर्वी घडली असती तर स्थिती दयनीय झाली असती. सध्या हरभरा, तूर आणि गहू यांची आवक पूर्वीच्या तुलनेत फारच कमी आहे. हरभरा पावसात भिजल्यामुळे खराब होतो आणि त्यामुळे भाव ३०० ते ४०० रुपयाने कमी होतो.

गेल्या १५ दिवसांच्या तुलनेत उठाव नसल्यामुळे हरभरा, तूर आणि गव्हाचे भाव कमी झाले आहेत. सध्या बाजारात हरभरा ४,२०० रुपये क्विंटल, तुरीचा ५,५०० ते ६ हजार रुपये क्विंटल भाव आहे. तेजी-मंदी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे.

लिलावाच्या शेडबाहेर असते धान्य

लिलावाच्या जागेत तात्पुरती शेड उभारण्याची मागणी गेल्या १५ वर्षांपासून समितीकडे वारंवार करत असल्याचे समितीचे संचालक आणि धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड यांनी सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. बोलीसाठी जास्त धान्य आल्यास रस्त्यावर ठेवावे लागते. व्यापाऱ्यांनी माल उचलेपर्यंत तो तसाच असतो. अशावेळी अवकाळी पाऊस आल्यास तो भिजतो. हे लिलाव दालन ३५ वर्षांपूर्वी तयार झाले आहे. शेड उभारण्यासाठी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. कारण धान्य भिजल्यास शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळत नाही आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांवर अशी वेळ दरवर्षीच येते. त्यामुळे समितीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

डोम उभारण्याची मागणी समितीकडे पुन्हा करणार

काहीच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. यावेळी खुल्या जागेतील धान्य भिजण्याची भीती आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून शेड उभारण्याची मागणी धान्य बाजार असोसिएशन अडतिया समितीच्या अध्यक्षांकडे करणार आहेत.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी