शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पावसामुळे कळमन्यात लाखोंचे धान्य भिजले; शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 15:48 IST

समिती शेतकऱ्यांच्या सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटनेने आला आहे.

ठळक मुद्देबाजार समितीतर्फे सुरक्षेची व्यवस्था नाही; शेतकऱ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष

नागपूर : कळमन्यात वर्षभरात जवळपास २० ते २२ वेळा अवकाळी पावसामुळे खुल्या जागेतील धान्य भिजण्याच्या घटना घडतात आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. त्यानंतरही कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना जाग येत नाही. खुल्या जागेत तात्पुरती शेड उभारण्याची ३५ वर्षांपासून करण्यात येणारी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. समिती शेतकऱ्यांच्या सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटनेने आला आहे.

बाजारात धान्याची आवक कमी असल्यामुळे मध्यरात्री जवळपास २ हजार धान्यांची पोती भिजली. हा अवकाळी पाऊस १५ दिवसांपूर्वी आला असता तर शेतकऱ्यांची जवळपास २५ हजार पोती भिजली असती. आता १५ दिवसांवर पेरणी आल्यामुळे शेतकऱ्यांकडून बाजारात धान्याची कमी आवक होत आहे. मात्र, हीच घटना १५ दिवसांपूर्वी घडली असती तर स्थिती दयनीय झाली असती. सध्या हरभरा, तूर आणि गहू यांची आवक पूर्वीच्या तुलनेत फारच कमी आहे. हरभरा पावसात भिजल्यामुळे खराब होतो आणि त्यामुळे भाव ३०० ते ४०० रुपयाने कमी होतो.

गेल्या १५ दिवसांच्या तुलनेत उठाव नसल्यामुळे हरभरा, तूर आणि गव्हाचे भाव कमी झाले आहेत. सध्या बाजारात हरभरा ४,२०० रुपये क्विंटल, तुरीचा ५,५०० ते ६ हजार रुपये क्विंटल भाव आहे. तेजी-मंदी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे.

लिलावाच्या शेडबाहेर असते धान्य

लिलावाच्या जागेत तात्पुरती शेड उभारण्याची मागणी गेल्या १५ वर्षांपासून समितीकडे वारंवार करत असल्याचे समितीचे संचालक आणि धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड यांनी सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. बोलीसाठी जास्त धान्य आल्यास रस्त्यावर ठेवावे लागते. व्यापाऱ्यांनी माल उचलेपर्यंत तो तसाच असतो. अशावेळी अवकाळी पाऊस आल्यास तो भिजतो. हे लिलाव दालन ३५ वर्षांपूर्वी तयार झाले आहे. शेड उभारण्यासाठी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. कारण धान्य भिजल्यास शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळत नाही आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांवर अशी वेळ दरवर्षीच येते. त्यामुळे समितीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

डोम उभारण्याची मागणी समितीकडे पुन्हा करणार

काहीच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. यावेळी खुल्या जागेतील धान्य भिजण्याची भीती आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून शेड उभारण्याची मागणी धान्य बाजार असोसिएशन अडतिया समितीच्या अध्यक्षांकडे करणार आहेत.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी