शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराचा वाढतोय विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:07 IST

नागपुरात सुमारे ५० हजारांवर रुग्ण : मेयोच्या मनोविकृती शास्त्र विभागाचे सर्वेक्षण

सुमेध वाघमारे

नागपूर : सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाईल मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागात उपचारासाठी रोज येणाऱ्या साधारण २०० रुग्णांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. या विभागाने मागे केलेल्या एका सर्वेक्षणात, नागपुरात साडेसहा तास व त्यापेक्षा जास्त मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले. यावरून शहरात सुमारे ५० हजार ते एक लाख लोक या व्यसनात आकंठ बुडाले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला. धक्कादायक म्हणजे, यातील बहुसंख्य लोकांना मोबाईलमुळे मानसिक आजाराकडे आपली वाटचाल होत असल्याचे ध्यानीमनीही नाही. यामुळे ते आणखी धोकादायक ठरत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मोबाईलच्या गरजेचं रूपांतर व्यसनात होऊ लागले आहे. लहानांना त्याची सवय तर तरुण पिढीवर त्याचे थेट दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. मेयोच्या मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, मनोविकारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मोबाईलचा अतिवापर हे एक कारण प्रकर्षाने दिसून येत आहे. मेयो रुग्णालयाच्यावतीने मोबाईलच्या अतिवापराला घेऊन एका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १८ ते २० वयोगटातील १०० मुलांवर नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यात सर्वच मुलांनी दिवसाच्या साडेसहापेक्षा जास्त तास मोबाईलवर घालवीत असल्याचे, तर काहींनी १२ ते १४ तास वापर करीत असल्याचे सांगितले.

- या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर व्यसन

तुम्ही तुमच्या झोपेच्यावेळही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत असाल, घरातील किंवा कार्यालयातील लोक तुमच्या मोबाईलच्या वापराला घेऊन चिडत असतील, मोबाईलचा वापर लपविण्याचा तुम्ही प्रयत्न करीत असाल, मोबाईल सोडून दुसऱ्या कुठल्याही कामात मन लागत नसेल तर तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागले आहे, असा त्याचा समज असल्याचे डॉ. सोमानी यांनी सांगितले.

- मोबाईल आजाराची लक्षणे

मोबाईलचा वापर दरदिवसाला वाढणे, वापर न केल्यास अस्वस्थता वाटणे, मोबाईल वाजल्याचा सतत भास होणे.

मोबाईलवर सतत गेम खेळणे, सेल्फी घेण्याचा नाद निर्माण होणे, मोबाईल हातात नसताना बोटाच्या हालचाली होणे, मोबाईल जवळ नसला तरी तो वाजल्याचा आवाज येणे ही मोबाईलच्या आजाराची लक्षणे आहे. यातून पुढे छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन ताण निर्माण होऊन नैराश्य येऊ शकते.

- काय करावे

डॉ. सोमानी म्हणाले, मोबाईलचा अतिवापर कमी करण्यासाठी काही असे ठिकाण ठरवावे जिथे मोबाईलचा वापर करू नये, जसे सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करताना किंवा ‘जिम’ला जाताना मोबाईल सोबत घेऊन जाऊ नये. जेवताना मोबाईलचा वापर करू नये. झोपताना मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा. कुटुंबासोबत फिरायला गेले असताना मोबाईलचा कमीतकमी वापर करावा, मोबाईलमध्ये असे काही ॲप्स टाकावे ज्यामध्ये कोणते ॲप्स कितीवेळ पाहावे ते सांगते, आदींचा फायदा होतो.

टॅग्स :Healthआरोग्यMobileमोबाइलMental Health Tipsमानसिक आरोग्य