शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या ५८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे जीव आहेत धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 20:03 IST

Nagpur : जिल्हा परिषदेच्या १५१२ शाळा असून ७२,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. ५८८ शाळांत पावसाळ्यात पाणी गळती, भिंतींना ओल येणे, छप्पर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाबाजूला नवीन शैक्षणिक धोरण, एआय तंत्रज्ञान व कोट्यवधींच्या साहित्य खरेदीची दावे केले जात आहेत पण दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थी अजूनही जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत, ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल ५८८ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या १५१२ शाळा असून ७२,००० विद्यार्थीशिक्षण घेतात. ५८८ शाळांत पावसाळ्यात पाणी गळती, भिंतींना ओल येणे, छप्पर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाला दुर्घटनेची वाट बघायची आहे का, असा संतप्त सवाल पालक व नागरिक करत आहेत.

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शाळेचे वातावरण आनंददायी असणे गरजेचे आहे. परंतु इमारतीच चांगल्या नसतील तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुर्घटना होण्याचा धोका

शाळेचे छत वा भिंत कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातीलही परिस्थिती त्याहून वेगळी नाही. अनेक शाळा जुन्या असून जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण शाळांचे छत कोसळून वा भिंत पडून दुर्घटना होण्याचा धोका आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

साहित्य धूळखात पडून

विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी होते, पण ते वापरात येत नाही; काही साहित्य तर धूळखात पडले आहे. मग जीर्ण शाळांची दुरुस्ती करण्यासाठी निधी का नाही, असा थेट सवाल पालक विचारत आहेत.

धोकादायक आकडेवारी

  • धोकादायक वर्गखोल्या - ५८८
  • आवश्यक नव्या वर्गखोल्या - १९०
  • मोठ्या दुरुस्तीची गरज असलेल्या वर्गखोल्या - १०९
  • किचन शेड आवश्यक - १०९
  • विद्युतीकरण आवश्यक शाळा - १३४
  • संरक्षण भिंत नसलेल्या शाळा - ६६३

 

शॉक लागण्याचा धोका

साध्या इमारती पावसाळ्यात गळक्या आहेत, संरक्षण भिंती नाहीत, अनेक शाळा अजूनही वीजपुरवठा व्यवस्थित नाही. विद्यार्थ्यांना शॉक लागून दुर्घटना होण्याचा धोका कायम आहे. हजारो विद्यार्थी या धोकादायक इमारतींमध्ये शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणTeacherशिक्षक