शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

नातेसंबंधांच्या वास्तवाचे कटू वास्तव : मुलीकडून वडिलांविरुद्ध न्यायालयात लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:37 IST

कितीही कटू असली, तरी वास्तव बाब : नागपूर खंडपीठाचे निरीक्षण, जीवनाच्या परिस्थितीवर भाष्य

राकेश घानोडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नातेसंबंध जशाच्या तसे अनंतकाळ कायम राहावे, असे वाटणे केवळ कल्पनेचा भाग आहे. वास्तविक जीवनात असे होत नाही. नातेसंबंध काळानुसार बदलत असतात. वेळ आल्यास मुलगीही तिच्या कायदेशीर अधिकारांसाठी स्वतःच्या वडिलांना कोर्टात खेचू शकते. ही बाब कितीही कटू असली तरी, वास्तव आहे, असे मानवी जीवनाच्या परिस्थितीवर भाष्य करणारे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

नागपूर येथील रहिवासी असलेल्या या प्रकरणातील वडिलाने पूर्वजांची मालमत्ता असलेले एक दुकान बक्षीसपत्राद्वारे मुलीच्या नावे केले. त्यावेळी वडिलाचे मुलीसोबतचे संबंध चांगले होते. मुलगी वडिलांची काळजी घेत होती. दरम्यान, मुलीने वडिलांविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यामुळे वडिलाने मुलीला दिलेल्या दुकानाचे बक्षीसपत्र रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावताना वरील निरीक्षण नोंदविले. तसेच, मुलीने दाखल केलेली संबंधित तक्रार बक्षीसपत्र रद्द करण्याचे कारण ठरू शकत नाही, असे स्पष्ट केले. मुलीच्या वतीने अॅड. अतुल पांडे यांनी कामकाज पाहिले. 

...तरच मालमत्ता परत मिळू शकेल

  • पालकांनी मुले त्यांची देखभाल करतील, अशी अट करारात नमूद करून मालमत्ता मुलांच्या नावावर केली असेल आणि त्यानंतर मुलांनी पालकांची देखभाल करण्याला नकार दिल्यास, माता-पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण कायद्यानुसार संबंधित करार रद्द होऊन मालमत्ता पालकांना परत मिळू शकते, असेही उच्च न्यायालयाने सांगितले.
  • या प्रकरणातील बक्षीसपत्रात अशी अट नव्हती. त्यामुळे वडिलाची याचिका अपयशी ठरली. याशिवाय, मुलगी स्वतःच निराधार व असहाय्य स्त्री असल्यामुळे ती वडिलाची देखभाल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेदेखील न्यायालय म्हणाले.

आधी दोन निर्णय वडिलाच्या विरोधात

  • मुलीच्या नावाने २ फेब्रुवारी २०१६ रोजी केलेले वादग्रस्त बक्षीसपत्र रद्द करण्यासाठी वडिलाने सुरुवातीला निर्वाह न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता.
  • तो अर्ज ८ फेब्रुवारी २०२१ रोजी फेटाळण्यात आला. त्यानंतर अपिलीय प्राधिकरणने वडिलाचे अपील १० डिसेंबर २०२१ रोजी फेटाळून लावले.
  • परिणामी, त्यांनी उच्च 3 न्यायालयात धाव घेतली होती. या पक्षकारांचा बक्षीसपत्रासंदर्भात दिवाणी न्यायालयातसुद्धा वाद सुरू आहे.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय