शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

दिव्यांग शाळा व कर्मशाळेत १५ वर्षांपासून पगार नसल्याने शिक्षकांनी मागितली हिवाळी अधिवेशनात भीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 20:38 IST

राज्यातील तब्बल १२३ शाळांतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळावा, या मागणीसाठी शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलनही सुरू केले. परंतु त्याची दखल न घेतल्याने बुधवारी (दि. १३) आंदोलक शिक्षकांनी धरणे मंडपात भीक मागितली.

ठळक मुद्देउदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर अडीच हजार शिक्षकांचे भवितव्य अंधारात

गणेश खवसे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : शिक्षक हा शब्द उच्चारला तरी शिक्षकाची आगळीवेगळी अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शिक्षकांविषयीची भावना, भीतीयुक्त आदर आणि शिक्षकांचे आपल्या मनातील स्थान हे अत्युच्च आहे. मात्र याच शिक्षकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. विश्वास बसत नाही ना, पण हे खरे आहे. गेल्या १५ वर्षांपासून दिव्यांग शाळा, कर्मशाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. एवढेच काय तर मानधनही मिळत नाही. त्यामुळे राज्यातील तब्बल १२३ शाळांतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळावा, या मागणीसाठी शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलनही सुरू केले. परंतु त्याची दखल न घेतल्याने बुधवारी (दि. १३) आंदोलक शिक्षकांनी धरणे मंडपात भीक मागितली. हे अनोखे आंदोलन करून त्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मशाळा कृती समितीच्यावतीने पीडित शिक्षक पटवर्धन मैदानात धरणे-आंदोलन करीत आहेत. महाराष्टत विनाअनुदान तत्त्वावरील १२३ दिव्यांग शाळेतील कार्यरत शिक्षकांना गेल्या १५ वर्षांपासून मानधन, वेतन दिले जात नाही तरीही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे अविरत सेवा देत आहेत. विशेष म्हणजे शाळा चालविण्यासाठीही शासन कुठलेच अनुदान देत नाही. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्थाच नव्हे तर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देताना आर्थिक अडचणी येतात. १५ वर्षांपासून शिक्षक कार्यरत असून एक रुपयाही त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे.ही समस्या सोडविण्यात यावी, यासाठी १२३ शाळांतील शिक्षकांनी एका छताखाली एकत्र येत दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मशाळा कर्मचारी कृती समिती स्थापन करून यासाठी लढा दिला जात आहे. ही मागणी लावून धरल्यानंतर ८ एप्रिल २०१५ रोजी शासनाने तोंडी आणि लेखी आश्वासनही दिले होते. मात्र त्यास अडीच वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने शब्द पाळला नाही. त्यामुळे या शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. यामुळेच अखेर या शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. आतापर्यंत धरणे आंदोलन, मोर्चा याद्वारे या १२३ शाळांतील शिक्षकांनी शासनदरबारी आपली मागणी रेटून धरली, मात्र त्याचा काहीएक फायदा झाला नाही. यामुळे शिक्षक संतप्त झाले असून, त्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला.आंदोलनात जितेंद्र पाटील, मारोती भोयर, अविनाश खिरेकेकर, वैशाली कडू, प्रतीक व्यवहारे, नितीन फटिंग, सचिन मेश्राम, सुनिता अवचट, मंदा हिरुडकर, नंदकिशोर मुरकुटे, स्नेहदीप जैन, प्रकाश माहुरे आदी सहभागी झाले होते. याच प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १८) विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.आश्वासन नको; अंमलबजावणी करा!राज्यातील १२३ दिव्यांग शाळा व कर्मशाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाºयांना पगार नाही. याबाबत त्यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ८ एप्रिल २०१५ रोजी अनुदान देण्याबाबतचा आदेश निर्गमित केला. परंतु त्यानंतर शासनाने काहीच हालचाली केल्या नाही. यामुळे शिक्षकांनी राज्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा याद्वारे मागणीकडे लक्ष वेधले. दरम्यान, आंदोलक शिक्षकांना तोंडीच नव्हे तर लेखी आश्वासनही मिळाले. मात्र ही आश्वासने हवेतच विरली. त्यामुळे आता आश्वासन नको, पदमान्यता देऊन वेतन सुरू करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Teacherशिक्षक