शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग शाळा व कर्मशाळेत १५ वर्षांपासून पगार नसल्याने शिक्षकांनी मागितली हिवाळी अधिवेशनात भीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 20:38 IST

राज्यातील तब्बल १२३ शाळांतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळावा, या मागणीसाठी शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलनही सुरू केले. परंतु त्याची दखल न घेतल्याने बुधवारी (दि. १३) आंदोलक शिक्षकांनी धरणे मंडपात भीक मागितली.

ठळक मुद्देउदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर अडीच हजार शिक्षकांचे भवितव्य अंधारात

गणेश खवसे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : शिक्षक हा शब्द उच्चारला तरी शिक्षकाची आगळीवेगळी अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शिक्षकांविषयीची भावना, भीतीयुक्त आदर आणि शिक्षकांचे आपल्या मनातील स्थान हे अत्युच्च आहे. मात्र याच शिक्षकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. विश्वास बसत नाही ना, पण हे खरे आहे. गेल्या १५ वर्षांपासून दिव्यांग शाळा, कर्मशाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. एवढेच काय तर मानधनही मिळत नाही. त्यामुळे राज्यातील तब्बल १२३ शाळांतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळावा, या मागणीसाठी शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलनही सुरू केले. परंतु त्याची दखल न घेतल्याने बुधवारी (दि. १३) आंदोलक शिक्षकांनी धरणे मंडपात भीक मागितली. हे अनोखे आंदोलन करून त्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मशाळा कृती समितीच्यावतीने पीडित शिक्षक पटवर्धन मैदानात धरणे-आंदोलन करीत आहेत. महाराष्टत विनाअनुदान तत्त्वावरील १२३ दिव्यांग शाळेतील कार्यरत शिक्षकांना गेल्या १५ वर्षांपासून मानधन, वेतन दिले जात नाही तरीही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे अविरत सेवा देत आहेत. विशेष म्हणजे शाळा चालविण्यासाठीही शासन कुठलेच अनुदान देत नाही. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्थाच नव्हे तर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देताना आर्थिक अडचणी येतात. १५ वर्षांपासून शिक्षक कार्यरत असून एक रुपयाही त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे.ही समस्या सोडविण्यात यावी, यासाठी १२३ शाळांतील शिक्षकांनी एका छताखाली एकत्र येत दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मशाळा कर्मचारी कृती समिती स्थापन करून यासाठी लढा दिला जात आहे. ही मागणी लावून धरल्यानंतर ८ एप्रिल २०१५ रोजी शासनाने तोंडी आणि लेखी आश्वासनही दिले होते. मात्र त्यास अडीच वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने शब्द पाळला नाही. त्यामुळे या शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. यामुळेच अखेर या शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. आतापर्यंत धरणे आंदोलन, मोर्चा याद्वारे या १२३ शाळांतील शिक्षकांनी शासनदरबारी आपली मागणी रेटून धरली, मात्र त्याचा काहीएक फायदा झाला नाही. यामुळे शिक्षक संतप्त झाले असून, त्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला.आंदोलनात जितेंद्र पाटील, मारोती भोयर, अविनाश खिरेकेकर, वैशाली कडू, प्रतीक व्यवहारे, नितीन फटिंग, सचिन मेश्राम, सुनिता अवचट, मंदा हिरुडकर, नंदकिशोर मुरकुटे, स्नेहदीप जैन, प्रकाश माहुरे आदी सहभागी झाले होते. याच प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १८) विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.आश्वासन नको; अंमलबजावणी करा!राज्यातील १२३ दिव्यांग शाळा व कर्मशाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाºयांना पगार नाही. याबाबत त्यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ८ एप्रिल २०१५ रोजी अनुदान देण्याबाबतचा आदेश निर्गमित केला. परंतु त्यानंतर शासनाने काहीच हालचाली केल्या नाही. यामुळे शिक्षकांनी राज्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा याद्वारे मागणीकडे लक्ष वेधले. दरम्यान, आंदोलक शिक्षकांना तोंडीच नव्हे तर लेखी आश्वासनही मिळाले. मात्र ही आश्वासने हवेतच विरली. त्यामुळे आता आश्वासन नको, पदमान्यता देऊन वेतन सुरू करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Teacherशिक्षक