शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कायदा पाळाल तर फायद्यात राहाल, अन्यथा कडक कारवाई; नागपूर पोलीस आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 12:41 IST

पोलिसांनीही कंबर कसली असून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नागपूर : शहरातील सामाजिक सलोखा कुणी बिघडवण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी दिला. शहर पोलीस पूर्णपणे हाय अलर्ट मोडवर असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

अजान, भोंगे अन् हनुमान चालिसा तसेच महाआरतीच्या संबंधाने सध्या वातावरण गरम झाले आहे. या संबंधाने ४ मे पासून राज्यातील ठिकठिकाणचे सामाजिक वातावरण दूषित होऊ शकते,असा इशारा गुप्तचर खात्याकडून मिळाला आहे. जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनीही कंबर कसली असून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी रात्री यासंबंधाने पत्रकारांसोबत चर्चा केली. ते म्हणाले,

सामाजिक सलोखा बिघडेल, अशा कोणत्याही कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी मिळणार नाही. कुणी जबरदस्तीने किंवा लपून छपून महाआरती अथवा कोणताही कार्यक्रम करण्याचे प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. आमची सर्व पक्षाच्या व्यक्ती समुदायाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. सर्वांनीच सहकार्याचे आश्वासन दिल्याने कोणतीही गडबड होणार नाही, याचा विश्वास आहे. तरीसुद्धा शहरातील सर्व पोलीस स्टेशन, त्यांच्या सोबत दीड ते दोन हजार पोलीस, ६०० होमगार्ड आणि एसआरपीची कंपनी बंदोबस्तात तैनात राहणार आहे. परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने बंदोबस्त ५ ते ६ हजारांचा करू, गरज पडल्यास बाहेरूनही संख्याबळ मागवू, मात्र जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना अद्दल घडवू,असेही पोलीस आयुक्त म्हणाले.

नोटीस, प्रतिबंधक कारवाई

नोटीसचा प्रश्न उपस्थित केला असता, कुण्या विशिष्ट पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांना आम्ही टार्गेट केलेले नाही. मात्र, आमची संबंधितांवर सूक्ष्म नजर आहे. त्यामुळे गेल्या काही तासात ६३९ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून, १४९ नुसार, २९३ जणांना तर ११०, १०७ नुसार हजार पेक्षा जास्त जणांना नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील धार्मिक, प्रार्थना स्थळे

शहरात २३९ मशिदी, १२०४ मंदिर आणि ४०० बाैद्धविहार आहेत. भोंग्याचा अथवा लाऊडस्पिकरचा मुद्दा कुण्या एकासाठी नव्हे तर कायद्यानुसार सर्वांसाठीच सारखा राहिल, असेही पोलीस आयुक्तांनी एका प्रश्नाच्या संबंधाने स्पष्ट केले.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर