शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपूर जि.प.कडून मंजुरी न मिळाल्यामुळे सोलरचा प्रकाश थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:42 IST

दोन महिन्याहुन अधिक काळापासून जि.प.च्या शिक्षण विभागाने बदललेल्या शाळांची कुठलीही प्रशासकीय मंजुरी महाऊर्जाला उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे २८७ शाळांवर पडणारा सौर उर्जेचा प्रकाश अजूनही पडला नाही.

ठळक मुद्देसोलरद्वारे होणार होता २८७ शाळांमध्ये वीज पुरवठा४.८ कोटी रुपयांची होती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या २०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे तर जिल्हा प्रशासन दुसरीकडे २८७ शाळांमध्ये सोलरद्वारे वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषदेने यासाठी शाळांची निवडही केली. मात्र पुन्हा नाव बदलवून देण्यासाठी सोलर बसविण्याचे काम थांबविण्यात आले. दोन महिन्याहुन अधिक काळापासून जि.प.च्या शिक्षण विभागाने बदललेल्या शाळांची कुठलीही प्रशासकीय मंजुरी महाऊर्जाला उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे २८७ शाळांवर पडणारा सौर उर्जेचा प्रकाश अजूनही पडला नाही.जिल्हा परिषदेच्या २०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. या शाळांनी विजेचे बिलच भरलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वीज बिल भराच्या कटकटीपासून शाळांना मुक्ती मिळवून देण्यासाठी शाळा सोलरवर करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात २८७ शाळांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी ४.८० कोटी रुपयांची तरतूद खनिज निधीतून करण्यात आली. महाऊर्जाकडे निधीचे हस्तांतरणही करण्यात आले. त्यानंतर महाऊर्जाने सर्वेक्षण करून २८७ शाळांची निवड केली. त्यासंदर्भात निविदाही काढण्यात आली. परंतु शिक्षण विभागाने शाळेच्या निवडीवरून आक्षेप घेतला व काही शाळा बदलून नवीन यादी दिली. परंतु महाऊर्जाने नवीन यादीला प्रशासकीय मंजुरी देण्यासंदर्भात मागणी केली. परंतु तीन महिन्यानंतरही शिक्षण विभागाने प्रशासकीय मंजुरी मिळविली नाही. जि.प.कडून सांगण्यात येत आहे की, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय मंजुरी मिळू शकली नाही. विशेष म्हणजे जि.प.च्या शाळा सौरऊर्जेवर आणण्याचा मानस होता. नागपूर जिल्ह्यात जि.प.च्या १५३१ शाळा आहे. यात पहिल्या टप्प्यात खनिज निधीमधुन २८७ शाळा सौर ऊर्जेवर येणाऱ्या होत्या.२००च्या जवळपास शाळा अंधारातजि.प.च्या शाळांना महावितरणद्वारे वीज पुरवठा होतो. परंतु अनेक शाळांनी नियमित वीज बिल भरले नाही. त्यामुळे महावितरणने शाळेचा वीज पुरवठा खंडित केला. २०१६ पासून काही शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या शाळा मतदानाचे केंद्र होत्या. तेव्हा प्रशासनाने तात्पुरती विजेची व्यवस्था शाळेत केली होती. मात्र त्यावर कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात प्रशासन असमर्थ आहे.पालकमंत्र्यांचे विशेष प्रयत्नगत काही महिन्यांपासून जि.प.च्या सुमारे २०० शाळांचा थकीत वीज देयकापोटी वीज पुरवठाच खंडित करण्यात आला असल्याची माहिती आहे. या शाळाही सौर उर्जेच्या प्रकाशावर आणण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. शाळा सौर पॅनलच्या माध्यमातून प्रकाशमय करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मात्र, परंतु नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात बावनकुळे राहतील की नाही, याची साशंकता आहे. त्यामुळे या शाळांचे भवितव्य काय असणार हे सांगणे कठीण झाले आहे.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSchoolशाळा