शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सर्पदंशाने गँगरीन झालेला पाय वाचविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 1:37 AM

एका तिशीतील तरुणाच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याने जीवाचा धोका निर्माण झाला होता. चावा घेतलेले ठिकाण सडण्यास सुरुवात झाली होती. गँगरीन वाढून पाय कापण्याची शक्यता होती. परंतु डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेत पेशींचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या प्रयत्नांना यश : पेशीय प्रत्यारोपणाने धोका टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका तिशीतील तरुणाच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याने जीवाचा धोका निर्माण झाला होता. चावा घेतलेले ठिकाण सडण्यास सुरुवात झाली होती. गँगरीन वाढून पाय कापण्याची शक्यता होती. परंतु डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेत पेशींचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला.समुद्रपूरच्या सालेरगाव येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालात काम करणाऱ्या एका तरुणाला काही दिवसांपूर्वी ‘व्हायपर’ जातीच्या विषारी सापाने चावा घेतला. त्याला गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास रुग्णाला अत्यवस्थ स्थितीत ‘ऑरेंज सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये आणण्यात आले. रुग्णाच्या डाव्या पायावर सूज येऊन तीव्र वेदना होत होत्या. पायात गँगरीन होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ.राजेश अटल व प्लास्टीक सर्जरी तज्ज्ञ डॉ.गौरव जन्नावार यांनी युवकावर ‘अँटी व्हेनम’ औषधांपासून उपचाराची सुरुवात केली. तपासणीनंतर, रुग्णाला डाव्या पायाला विषबाधेमुळे ‘व्हस्क्युलोटॉक्सिक’चा संसर्ग झाल्याचे निदान झाले. मूत्रपिंडावरही याचा प्रभाव पडला होता. विषबाधेमुळे डाव्या पायाच्या टाचेजवळ प्रचंड वेदना आणि गँगरीन अशी गुंतागुंत निर्माण झाली. डॉक्टरांनी तातडीने ‘अ‍ॅलो -ट्रान्सप्लान्टेशन’ म्हणजे पेशीय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. डॉ. जन्नावार, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ.नीता देशपांडे आणि डॉ.अनिता पांडे यांच्या चमूने तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉ. जन्नावार यांनी सांगितले, पारंपरिक पद्धतीने जखमेची मलमपट्टी केल्यास, ती भरून येण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. शिवाय, पेशींचा विकासही उशिरा होतो. यामुळे रुग्णाच्या मांडीतील काही भाग ‘मायक्रोव्हस्क्युलर अ‍ॅनास्टॉमोसिस’ पद्धतीने टाचेच्याजागी प्रत्यारोपित करण्यात आला. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला. शिवाय रुग्णाच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली, असेही ते म्हणाले. डॉ. अटल यांनी सांगितले, विषारी सापांच्या चावण्याच्या घटना साधारणपणे, वैद्यकीय केंद्रांपासून दूर आणि बहुतांश दुर्गम ठिकाणी घडतात. यामुळे रुग्णालयात येईपर्यंत गुंतागुंत वाढलेली असते. तातडीने निर्णय व औषधोपचार करणे गरजेचे असते. या रुग्णाला आवश्यक सोयी लवकर उपलब्ध झाल्यामुळेच त्याचा जीव व पायही वाचला. नायरसन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष उदयभास्कर नायर यांनी डॉक्टरांच्या तत्परतेचे कौतुक केले. दरम्यान, रुग्णावर उपचार पूर्ण झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsnakeसाप