शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सहा रेल्वे गाड्या ऐनवेळी रद्द

By admin | Updated: August 8, 2015 03:07 IST

मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे तिसऱ्या दिवशी नागपुरातून सुटणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द ....

प्रवाशांना बसला फटका : मध्य प्रदेशातील अपघातामुळे घेतला निर्णयनागपूर : मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे तिसऱ्या दिवशी नागपुरातून सुटणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. ऐनवेळी त्यांना मिळेल त्या वाहनाने आपल्या इच्छित स्थळी जाण्याची पाळी आली. यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.मध्य प्रदेशातील हरदा येथे तीन दिवसांपूर्वी दोन रेल्वेगाड्यांचे डबे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला होता. यामुळे मुंबई-इटारसी मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला होता. दरम्यान नागपुरात न येणाऱ्या काही रेल्वेगाड्या नागपूरमार्गे वळविण्यात आल्या होत्या. यामुळे नागपूर-वर्धा या मार्गावर आधीच क्षमतेपेक्षा जास्त गाड्या चालविण्यात येत असल्यामुळे या रुळावरील वाहतूक अतिशय व्यस्त झाली होती. दरम्यान ७ आॅगस्टला या मार्गावरील सहा रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यामुळे ऐनवेळी आपली रेल्वेगाडी रद्द झाल्याची माहिती मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्यांना आपले तिकीट रद्द करून इतर वाहनांनी जाण्याची पाळी आली. यात अनेक प्रवाशांनी दोन महिन्यापूर्वी आपल्या तिकिटांचे आरक्षण करून कन्फर्म तिकीट मिळविल्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या १० आॅगस्टपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप होणार आहे, हे विशेष. दरम्यान प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकावर माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. आपल्या गाड्यांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी ०७१२-२५६४३४३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)थर्डलाईन अभावी वाहतूक विस्कळीतनागपूर-वर्धा मार्गावर अप आणि डाऊन या दोन लाईन सुरू आहेत. मागील अनेक वर्षांपासून येथे थर्डलाईनची मागणी होत आहे. सध्या दररोज १०० रेल्वेगाड्या चालविण्याची या रेल्वे रुळांची क्षमता आहे. परंतू तरीसुद्धा १३५ रेल्वेगाड्या दररोज चालविण्यात येत आहेत. त्यामुळे येथे थर्डलाईन गरजेची होती. मध्य प्रदेशात हरदा येथे झालेल्या अपघातामुळे नागपूरमार्गे रेल्वेगाड्या वळविण्यात आल्यामुळे या रेल्वे रुळावरील ताण मागील तीन दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. थर्ड लाईनचे काम पूर्ण झाले असते तर ही वाहतूक सुरळीत झाली असती.