शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?

By निशांत वानखेडे | Updated: May 27, 2025 20:11 IST

Shalarth ID Ghotala Maharashtra: १२वीच्या निकालानंतर गुणांवर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. २४ जूनपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षासुद्धा सुरू होणार आहे.

निशांत वानखेडे, नागपूरशालार्थ आयडी घोटाळ्यामुळे नागपूर विभागात शैक्षणिक कामांना लकवा मारल्यासारखी स्थिती झाली आहे. विभागीय शिक्षण मंडळात अध्यक्ष व सचिव नसल्याने प्रशासकीय कामात अडथळे येत असून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सध्या १२वीचे पुनर्मुल्यांकनाचे काम सुरू आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढतील, त्यांच्या गुणवाढीला मंजुरी कोण देणार, नवी गुणपत्रिका कशी तयार होणार, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी पुढे जात असल्याने अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराचे घबाड उजेडात येत आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होत आहे. या कारवाई अंतर्गतच बोर्डाचे सचिव व प्रभारी अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांचे निलंबन होणेसुद्धा निश्चित आहे. त्यामुळे बोर्डाच्या कामावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 

वाचा >>आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?

विशेष म्हणजे १२ वीच्या निकालानंतर गुणांवर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. नागपूर विभागातून तब्बल २४१५ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज केला होता. त्यांच्यापैकी आतापर्यंत २११ विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला, ज्यांच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुल्यांकनाचे काम सुरू आहे. याशिवाय २२६ विद्यार्थ्यांचे रिटोटलिंगचे अर्जही प्राप्त झाले आहेत. 

पुनर्मुल्यांकनाचे काम रखडण्याची शक्यता

उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांची जुनी गुणपत्रिका घेऊन नवीन गुणपत्रिका द्यावी लागणार आहे. मात्र पुनर्मुल्यांकनाची फाईल मंजूर करण्यासाठी गुणपत्रिका छापण्यापूर्वी त्यावर सचिवाची स्वाक्षरी होणे आवश्यक आहे. हीच प्रक्रिया दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही लागू आहे. ही प्रक्रिया झाली नाही, तर विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनाचे काम रखडण्याची शक्यता आहे. 

२४ जूनपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षासुद्धा सुरू होणार आहे. तत्पूर्वी पुनर्मुल्यांकनाचे निकाल हाती आले नाही, तर यात उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही परीक्षेला सामोरे जावे लागेल, ही शक्यता नाकारता येत नाही.

सर्वत्र अनिश्चितता

नियमांनुसार, कोणतेही सरकारी पद इतके दिवस रिक्त राहू शकत नाही. समतुल्य अधिकाऱ्याला अतिरिक्त जबाबदारी सोपवणे आवश्यक आहे. परीक्षा मंडळातील अध्यक्षपद आधीच रिक्त आहे. त्यावर सचिव राहिलेल्या चितामण वंजारी यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. शिवाय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अटकेनंतर त्यांचे पदही वंजारी यांना देण्यात आले होते. 

आता वंजारी यांनासुद्धा अटक झाल्याने तिन्ही पदे रिक्त झाली आहेत. यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत चालणारी शालेय कर्मचाऱ्यांची पेन्शनची कामे, मेडिकल बिल आणि आकस्मिक तक्रारींचे निवारण करण्यासही कुणी उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वत्र अनिश्चितता पसरली आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण