शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?

By निशांत वानखेडे | Updated: May 27, 2025 20:11 IST

Shalarth ID Ghotala Maharashtra: १२वीच्या निकालानंतर गुणांवर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. २४ जूनपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षासुद्धा सुरू होणार आहे.

निशांत वानखेडे, नागपूरशालार्थ आयडी घोटाळ्यामुळे नागपूर विभागात शैक्षणिक कामांना लकवा मारल्यासारखी स्थिती झाली आहे. विभागीय शिक्षण मंडळात अध्यक्ष व सचिव नसल्याने प्रशासकीय कामात अडथळे येत असून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सध्या १२वीचे पुनर्मुल्यांकनाचे काम सुरू आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढतील, त्यांच्या गुणवाढीला मंजुरी कोण देणार, नवी गुणपत्रिका कशी तयार होणार, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी पुढे जात असल्याने अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराचे घबाड उजेडात येत आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होत आहे. या कारवाई अंतर्गतच बोर्डाचे सचिव व प्रभारी अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांचे निलंबन होणेसुद्धा निश्चित आहे. त्यामुळे बोर्डाच्या कामावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 

वाचा >>आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?

विशेष म्हणजे १२ वीच्या निकालानंतर गुणांवर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. नागपूर विभागातून तब्बल २४१५ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज केला होता. त्यांच्यापैकी आतापर्यंत २११ विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला, ज्यांच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुल्यांकनाचे काम सुरू आहे. याशिवाय २२६ विद्यार्थ्यांचे रिटोटलिंगचे अर्जही प्राप्त झाले आहेत. 

पुनर्मुल्यांकनाचे काम रखडण्याची शक्यता

उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांची जुनी गुणपत्रिका घेऊन नवीन गुणपत्रिका द्यावी लागणार आहे. मात्र पुनर्मुल्यांकनाची फाईल मंजूर करण्यासाठी गुणपत्रिका छापण्यापूर्वी त्यावर सचिवाची स्वाक्षरी होणे आवश्यक आहे. हीच प्रक्रिया दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही लागू आहे. ही प्रक्रिया झाली नाही, तर विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनाचे काम रखडण्याची शक्यता आहे. 

२४ जूनपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षासुद्धा सुरू होणार आहे. तत्पूर्वी पुनर्मुल्यांकनाचे निकाल हाती आले नाही, तर यात उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही परीक्षेला सामोरे जावे लागेल, ही शक्यता नाकारता येत नाही.

सर्वत्र अनिश्चितता

नियमांनुसार, कोणतेही सरकारी पद इतके दिवस रिक्त राहू शकत नाही. समतुल्य अधिकाऱ्याला अतिरिक्त जबाबदारी सोपवणे आवश्यक आहे. परीक्षा मंडळातील अध्यक्षपद आधीच रिक्त आहे. त्यावर सचिव राहिलेल्या चितामण वंजारी यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. शिवाय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अटकेनंतर त्यांचे पदही वंजारी यांना देण्यात आले होते. 

आता वंजारी यांनासुद्धा अटक झाल्याने तिन्ही पदे रिक्त झाली आहेत. यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत चालणारी शालेय कर्मचाऱ्यांची पेन्शनची कामे, मेडिकल बिल आणि आकस्मिक तक्रारींचे निवारण करण्यासही कुणी उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वत्र अनिश्चितता पसरली आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण