शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची

By admin | Updated: November 2, 2015 02:14 IST

धर्मसत्तेमध्ये नैतिकता पाळली जाते. राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची असते. देशातील सज्जन शक्तींनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस : मंगलनाथ महाराजांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळानागपूर : धर्मसत्तेमध्ये नैतिकता पाळली जाते. राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची असते. देशातील सज्जन शक्तींनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. मंगलनाथ महाराज यापैकीच एक आहेत. त्यांचा भक्तसंप्रदाय मोठा आहे. त्यांना शंकराचार्यांचा आशीर्वाद लाभला आहे. ते शतायुषी होऊन समाजाला मार्गदर्शन करीत राहतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले. नाथ संप्रदायातील चित्रकूट गादीचे अधिपती सद्गुरुयोगेश्वरानंद डॉ. मंगलनाथ महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते. रोडी परिवारातर्फे लक्ष्मीनगरातील राणी लक्ष्मीबाई सभागृह परिसरात आयोजित या सोहळ्याला रविवारपासून सुरुवात झाली. याप्रसंगी फडणवीस यांच्या हस्ते मंगलनाथ महाराज यांचा नागरी सत्कार करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी महाराज, आचार्य गोविंददेव गिरी महाराज, लोणी येथील सखाराम महाराज संस्थानचे प्रमुख नाना महाराज, कांचन गडकरी व अंकुर सिडस्चे अध्यक्ष रवी काशिकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अतिशय मानाची अपेक्षा, सतत वाद घालणे, रागावणे, परिग्रह करणे, आत्मप्रशंसा व मित्रद्रोह या सहा गोष्टी मनुष्याचे आयुष्य कुडतडून टाकतात. यामुळे आपण शतायुषी असूनही पूर्ण आयुष्य उपभोगू शकत नाही, असे मार्गदर्शन शंकराचार्यांनी केले. वीणा पेंडके यांनी मानपत्राचे वाचन, रेणुका देशकर यांनी संचालन तर, दिलीप रोडी यांनी आभार व्यक्त केले.(प्रतिनिधी)धार्मिकतेवरून देशात गैरसमज - गडकरीभारतीय जीवनमूल्ये, विचार व हिंदू धर्म जगात सर्वश्रेष्ठ आहे. परंतु, गेल्या काही काळापासून धार्मिकता व जातीवादावरून समाजामध्ये गैरसमज पसरविण्यात येत आहे. यातून संघर्ष निर्माण होत आहे. त्याचा राजकीय उपयोग केला जातोय, अशी खंत नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. साधूसंतांच्या संस्कारामुळे हिंदू संस्कृतीने जगात वेगळा ठसा उमटविला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे प्रगती होते पण, जीवन घडविण्याचे काम संस्कृती करीत असते. असे असले तरी आपल्याला स्वत:च्या देशात यावरून टीका सहन करावी लागत आहे. समाजाला भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. आज सोशल मीडियाचा वापर करून भारतीय जीवनमूल्ये रुजविण्याची गरज आहे. मंगलनाथ महाराज यांनी धार्मिक, व्यसनमुक्ती, प्रबोधन इत्यादी क्षेत्रात कार्य केले आहे. त्यांनी अनेक शिष्यांना दृष्टी दिली आहे. योग्य दृष्टी असल्याशिवाय समाजात परिवर्तन होऊ शकत नाही असेही गडकरी यांनी सांगितले.