शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या राजकारणातील नीतीमूल्ये हरविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:54 IST

आजच्या राजकारणात नीतीमत्ता हरविली आहे, राजकारणात गढूळपणा आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी केली.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शंकरराव, राजारामबापू व अण्णाभाऊ जन्मशताब्दी व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शंकरराव असो, यशवंतराव असो, जुन्या नेत्यामधील मूल्याधिष्ठित, नीतीमत्ता आज आठवली व अनुसरली जाते. आजच्या राजकारणात ती राहिली नाही. रात्री एका पक्षात असलेला नेता सकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतो. विचार, तत्त्व हद्दपार झाले आहेत. आजच्या राजकारणात नीतीमत्ता हरविली आहे, राजकारणात गढूळपणा आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्यावतीने शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भावे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित सोहळ्यात अध्यक्षस्थानी गिरीश गांधी, चंद्रकांत वानखडे, कवी डॉ. सागर खादीवाला, अनंतराव घारड, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, उमाकांत अग्निहोत्री, पत्रकार श्रीकांत बेनी आदी उपस्थित होते. मधुकर भावे पुढे म्हणाले, इतिहासात डोकावून बघितल्यास माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील व विलासराव देशमुख या चार खांबावर महाराष्ट्र राज्य उभे असल्याचे दिसेल. शंकरराव चव्हाण यांनी राज्यात तब्बल ३६ धरणे बांधली आहेत. खºया अर्थाने अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागविली. जायकवाडी प्रकल्पाला केंद्र शासनाचा विरोध असताना अधिकाऱ्यांना पाठविण्यापेक्षा त्यांनी स्वत: जाऊन बाजू मांडली व धरण मंजूर करून घेतले. आज हे धरण महाराष्ट्राची शान आहे.विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पालाही त्यांनी मजबुती दिली. दुसरीकडे राजारामबापू पाटील यांनीही जनतेसाठी प्रचंड कष्ट उपसले, शेतकऱ्यांसाठी पदयात्रा काढल्या. दुष्काळी भागात नळयोजना आणली. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला तोड नाही. प्रबोधन साहित्याच्या माध्यमातून दलित, शोषितांचे दु:ख त्यांनी जगासमोर मांडले. ते हे करू शकले कारण त्यांच्या नीतीमत्ता होती. लोकहितासाठी त्यांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवला. या तीन सुपुत्रांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक व सामाजिक जडणघडण केली, अशी भावना मधुकर भावे यांनी व्यक्त केली. शंकरराव चव्हाण यांचे म्हणणे तत्कालीन प्रमुखांनी ऐकले असते तर कदाचित शीख दंगली आणि बाबरी विध्वंस झाला नसता, असा उल्लेख त्यांनी केला.गिरीश गांधी यांनी राजारामबापू व शंकरराव चव्हाण यांच्यासोबतचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक चंद्रकांत वानखडे यांनी केले. संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. रेखा दंडिगे-घिया यांनी आभार मानले.

टॅग्स :Socialसामाजिक