शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

देशभक्ती कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही - प्रणव मुखर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 6:18 AM

आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे.

नागपूर : आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे. देशाला कुठलाही भूगोल, भाषा आणि धर्म-पंथाची चौकट नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशभक्ती ही कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही, असे परखड मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त करीत रा. स्व. संघाला खडे बोल सुनावले. संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी गजेंद्रसिंह प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसच्या मुशीतून घडलेले प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला येणार असल्यामुळे देशात खळबळ उडाली होती.हिंसाचाराविषयी नाराजीमी येथे देश व देशभक्ती काय असते हे समजवायला आलो आहे, असे म्हणत प्रणव मुखर्जी यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना मांडली. देशात सतत सुरू असलेल्या हिंसाचाराचा उल्लेख करीत त्यांनी नाव न घेता भाजपाचे कानही टोचले.भारतीय राष्ट्रवाद ही वैश्विक भावना आहे. भारताचा राष्ट्रवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वावर आधारित असल्याने भारताचे दरवाजे सर्वांना खुले आहेत. राष्ट्रवाद विशिष्ट एका जात, धर्म, भाषा यांच्या अधीन नाही. देशासाठी समर्पण हीच खरी देशभक्ती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.गांधी, नेहरूंचे विचार ऐकविलेया वेळी प्रणव मुखर्जी यांनी संघ स्वयंसेवकांना महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरूयांच्या विचारांमधील राष्ट्रवाद समजावून सांगितला.भारतीय राष्ट्रवाद हा विध्वंसक, आक्रमक नाही, असे महात्मा गांधी म्हणाले होते; तर पंडित नेहरू यांनी राष्ट्रवाद हा हिंदू, मुस्लीम, शीख व इतर धर्मांच्या विचारांच्या एकत्रीकरणातूनच येऊ शकतो, असे विचार मांडले होते.काँग्रेसमध्ये संतापनवी दिल्ली : प्रणव मुखर्जी रा. स्व. संघाच्या व्यासपीठावर गेल्याबद्दल काँग्रेसने स्पष्ट शब्दांत संताप व्यक्त केला आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा संघाशी संबंधित असताना आणि संघाचा इतिहास माहीत असताना मुखर्जी यांनी तिथे जायला नको होते, अशा आशयाचे ट्विट काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत संघाचा सहभाग नव्हता आणि तिरंग्याबद्दलही संघाला आदर नाही. गांधीजींच्या हत्येनंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी मिठाईही वाटली होती, याचाही उल्लेख काँग्रेसने ट्विटमध्ये केला आहे.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ