शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पद्मसंभव यांनी धम्मातून समाजाला उन्नत केले

By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST

आचार्य पद्मसंभव हे धम्म तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित होते. धम्माचे ज्ञान म्हणजे अमृत शिक्षण असल्याचीच त्यांची भावना होती. त्यांनी मृत्यूचे चिंतन केले होते आणि जीवनाचाही अभ्यास केला.

यशोसागर : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमाला
नागपूर : आचार्य पद्मसंभव हे धम्म तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित होते. धम्माचे ज्ञान म्हणजे अमृत शिक्षण असल्याचीच त्यांची भावना होती. त्यांनी मृत्यूचे चिंतन केले होते आणि जीवनाचाही अभ्यास केला. हे जीवन इतरांच्या उपयोगासाठी आणि स्वत:ला उन्नत करण्यासाठी आहे, हा साक्षात्कार त्यांना साधनेतून झाला. त्यामुळेच आपले जीवन असेपर्यंत चांगले आणि सकारात्मक कार्य करीत रहावे, असा संदेश त्यांनी केला. त्यांनी संपूर्ण देशाला धम्माच्या माध्यमातून उन्नत केले आणि धम्माचा प्रसार केला, असे मत पुणे येथील यशोसागर यांनी व्यक्त केले.
दीक्षाभूमी येथे आयोजित बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमालेत ते आचार्य पद्मसंभव विषयावर बोलत होते. आचार्य पद्मसंभव यांनी स्मशानात साधना केली. मृत्यूच्यावेळी पैसा, मित्र, नातेवाईक कुणीही कामात येत नाही तर फक्त धम्मच कामाला येतो. स्मशान हा आपल्या जीवनाचाच एक भाग आहे कारण जन्म झाला तेथे मृत्यू आहेच. त्यांनी जे ज्ञान मिळविले ते समाजाच्या कामात यावे म्हणून आचार्यांनी स्वत:ला झोकून दिले. पण लोकांसाठी काम करताना विविध भाषा आणि वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान असले पाहिजे. या ध्यासातून त्यांनी नालंदा येथे विविध विषयांचे ज्ञान मिळविले. कारण सर्वांनाच तत्त्वज्ञान कळणारे नव्हते. काम करताना त्यांना लोकांचे शारीरिक, मानसिक दु:ख दिसले. त्यावर मात करण्यासाठी आचार्यांनी वैद्यकशास्त्राचाही अभ्यास केला. संस्कृतसह अनेक भाषांमध्ये ते पारंगत झाले. भारताचे परिक्रमण करताना त्यांनी हिमालय गाठला. देश फिरताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसार केला आणि धम्माची स्थापना केली. ब्राह्मण पंडितांकडून त्यांना नेहमीच आव्हाने मिळत होती. एकदा त्यांनी ५०० ब्राह्मण पंडितांचे आव्हान स्वीकारले आणि बौद्धिक चर्चेत त्यांचा पराभव केला. त्यानंतर ब्राह्मण पंडितांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि पंडितांचे आचार्य म्हणून त्यांचे नान शाक्यसिंहापासून आचार्य पद्मसंभव झाले. पूर्वी संपूर्ण काश्मीर बौद्धमय होता. हिमाचलात काम करताना त्यांना तिबेटचे आमंत्रण आले आणि त्यांनी तिबेटमध्ये बॉन धर्म जो कर्मकांडात अडकला होता त्यातून तिबेटची सुटका करून तेथे धम्म स्थापन केला. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धम्मचारिणी विजया आणि मैत्रीसागर उपस्थित होते.