शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निर्यात शुल्क वाढीमुळे कांदे तीन दिवसांतच ७ ते ८ रुपयांनी होणार स्वस्त

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 20, 2023 19:27 IST

निर्यात शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढविल्याचा परिणाम

नागपूर : कांद्याची आवक कमी असल्याने ठोक बाजारात भाव मोठ्या प्रमाणात वाढले. दरवाढीची धोक्याची घंटी ओळखून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्याने नागपुरातील कळमना ठोक बाजारात दर्जानुसार २० ते २५ रुपये किलोवर पोहोचलेले लाल कांदे आणि ३० ते ३५ रुपये किलो दराचे पांढरे कांदे दोन दिवसांतच ७ ते ८ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. पुढे भाव आणखी कमी होतील, अशी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहे. 

टोमॅटोच्या भावानंतर कांद्याच्या वाढीव दराची ओरड सुरू झाली होती. पण केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गृहिणींना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे कांदे उत्पादन शेतकऱ्यांनी निर्यात वाढीच्या निर्णयाला सरकारची दडपशाही म्हटले आहे. निर्यात शुल्क वाढीचा परिणाम शनिवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील नाशिकच्या लासलगाव येथील मुख्य बाजारपेठेत दिसून आला. कांद्याचे भाव घसरल्याची माहिती आहे.

कळमना बाजारातील आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, यंदा प्रारंभी मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाले आणि आवक कमी झाली. आवकीच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हळूहळू वाढले. दुसरीकडे निर्यातही वाढली. किरकोळमध्ये लाल कांदे दर्जानुसार ५० रुपये आणि पांढरे कांदे ५५ ते ६० रुपये किलोवर पोहोचले. भाव कमी होताच भाव सामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. सध्या कळमन्यात नगर, बाळापूर, नाशिक, मध्यप्रदेशातून २० ट्रकची आवक आहे. पुढे आवक वाढून भाव कमी होतील.

मध्यंतरी कळमन्यात प्रतिकिलो २१० ते २२० रुपयांवर गेलेले लसणाचे दर दर्जानुसार १३० ते १८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हे दर मुसळधार पावसामुळे पीक खराब झाल्याने वाढले होते. भाव जानेवारीपर्यंत स्थिर राहतील किंवा वाढतील, असे गौरव हरडे म्हणाले. सध्या दररोज ५ ते ६ ट्रक लसूण विक्रीला येत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी