शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे वर्षापूर्वी प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, एकाचाही मृत्यू झाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST

अशीच एक घटना सव्वाशे वर्षापूर्वी घडली होती. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीची एक उपनदी आहे. तिचे नाव विरही गंगा ...

अशीच एक घटना सव्वाशे वर्षापूर्वी घडली होती. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीची एक उपनदी आहे. तिचे नाव विरही गंगा आहे. १८९३ मध्ये एक डोंगर खचल्यामुळे नदीचा प्रवाह बंद झाला. त्यावेळी पावसाचे दिवस होते. जवळच्या गावकऱ्यांनी इंग्रजांना याची माहिती दिल्यानंतर ते ताबडतोब सक्रिय झाले. सुमारे पावणे दोनशे किलोमीटर दूर असलेल्या हरिद्वारच्या रायवाला येथील अधीक्षक अभियंता ले. कर्नल पुलफोर्ड यांनी तत्काळ आपल्या अभियंत्यांना घटनास्थळावर पाठवले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तो बांध भरण्यासाठी एक वर्ष लागेल असा अंदाज लावण्यात आला. तसेच, बांध फुटल्यास मोठे नुकसान होईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली. त्या बांधाला गौना ताल नाव देण्यात आले. कर्नल पुलफोर्ड यांनी त्यांच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बांधावरच तैनात ठेवले. तेथून रायवालापर्यंत टेलिग्राफ लाईन टाकण्यात आली. तो टेलिग्राफ म्हणजे तार, जो गेल्यावर्षी संपुष्टात आला. ती टेलिग्राफ लाईन डोंगरांवरील जंगलात झाडांवर ठोकून लावण्यात आली. बांधावर सतत लक्ष ठेवले जात होते. दरम्यान, बांध तीन किलोमीटर लांब झाला. इंग्रजांनी जवळच गेस्ट हाऊस बांधले. तेथून बांध स्पष्ट दिसत होता. बांधाच्या पाण्यात बोटिंग व मासेमारी सुरू झाली. तो बांध भूवैज्ञानिकांसाठी कुतूहलाचा विषय झाला. त्यावेळचे सर्वात मोठे भूवैज्ञानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले. दरम्यान, तो बांध १५ ऑगस्ट १८९४ रोजी फुटण्याचा अंदाज लावण्यात आला. इंग्रजांनी नागरिकांना हटवण्यास सुुरुवात केली. त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले. अलकनंदा नदीवरील काही पूल हटवण्यात आले. त्यानंतर २७ ऑगस्ट १८९४ रोजी तो बांध फुटला व चमोली, रुद्रप्रयाग, श्रीनगर, ऋषिकेश, हरिद्वार या भागात मोठे नुकसान झाले. या घटनेला कुणीच थांबवू शकत नव्हते, पण विशेष म्हणजे या घटनेत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.

८५ वर्षानंतर १९७० मध्ये तो बांध दुसऱ्यांदा फुटल्यानंतर जनधनाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावरून इंग्रजांनी केलेले आपत्ती व्यवस्थापन किती उत्तम होते हे दिसून येते. देशविदेशातील तज्ज्ञ आजही त्या व्यवस्थापनाला सन्मानासह स्मरण करतात. परंतु, आपल्या सरकारकरिता ही घटना केवळ फाईलमधील एक उल्लेख आहे. त्यातून काही शिकण्याची कुणाचीच इच्छा नाही.

**************

पर्यावरणतज्ज्ञ व ज्येष्ठ पत्रकार सुशील बहुगुणा यांनी डोंगराळ भागातील आपत्तीवर २०१५ मध्ये लेख लिहिला होता. तो लेख सोशल मीडियावर उपलब्ध आहे. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात ग्लेशियर तुटल्यामुळे आलेली आपत्ती लक्षात घेता तो लेख प्रकाशित केला जात आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास सर्वात मोठी आपत्तीही कशी टाळली जाऊ शकते यावर हा लेख प्रकाश टाकतो.