शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी कार्यालयात, मग नगरसेवक उत्पन्न कसे वाढवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST

- विकासकामेच नाहीत, तर लोकांकडे कसे जाणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांचे हित लक्षात घेऊन मालमत्ता कर व ...

- विकासकामेच नाहीत, तर लोकांकडे कसे जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागरिकांचे हित लक्षात घेऊन मालमत्ता कर व पाणी करासाठी अभय योजना आणली आहे, परंतु ज्या हेतूने ही योजना आणली, तो हेतू पूर्ण होताना दिसत नाही. आजवरचे वसुलीचे आकडे समाधानकारक नाहीत. स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नगरसेवकांना उत्पन्न वाढीसाठी आवाहन केले, परंतु प्रभागातील विकासकामांसाठी निधी दिला नाही. ७०० कोटींची देणी असल्याचे कारण पुढे केले. यामुळे नगरसेवकांत नाराजी आहे. उत्पन्नवाढीत प्रशासन नापास ठरले आहे. वरिष्ठ अधिकारी आपल्या कक्षातून बाहेर पडत नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

झोन स्तरावरील अधिकारी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात अपयशी ठरले आहेत. आयुक्तांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी संतप्त नगरसेवकाने फाईल फेकली. वर्षभरापासून प्रभागातील गटर लाईन, चेंबरवरील झाकणे, नाल्याची भिंत दुरुस्ती, यासाठी निधी मिळत नाही. अत्यावश्यक कामे होत नसल्याने नागरिक कर कसे भरतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर भरूनही कामे होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनासाठीच कर भरायचा का, असा प्रश्न सदस्यांनी

उपस्थित केला.

अभय योजनेत पाणी कर थकीत असलेल्या ९९८३ ग्राहकांनी लाभ घेतला. ३.१२ कोटी जमा केले. एकूण थकबाकीच्या ३.०८ टक्के रक्कम जमा झाली. मालमत्ता करातून २७ डिसेंबरपर्यंत ५३४२ थकबाकीदारांनी ६.०३ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा केले.

...

प्रशासनाची उदासीनता : झलके

अभय योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा, मनपा तिजोरीत महसूल जमा व्हावा, या हेतूने ही योजना आणली आहे, परंतु मनपातील वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्यालयात बसून असतात. दुसरीकडे नगरसेवकांना उत्पन्न वाढविण्यास सांगितले जात आहे. वेतन अधिकारी घेणार व काम नगरसेवक करणार, त्यात अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. अशा परिस्थितीत नगरसेवक वसुलीसाठी नागरिकांकडे कसे जातील, असा सवाल स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी केला.

...

फोनवरून संपर्कात : बॅनर्जी

थकबाकीदारांशी झोन स्तरावरून संपर्क केला जात आहे. मोठ्या थकबाकीदारांना पत्र पाठविले जात आहे. अभय योजनेसंदर्भात जनजागृती केली जात आहे. त्यानंतरही थकबाकीदार कर भरत नसतील तर काय करणार, झोन स्तरावरील संबंधित अधिकारी याला जबाबदार असल्याचे जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले.