शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नऊ कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:21 IST

जून ते आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ९६४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब निदर्शनास आली आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाने घेतला आढावा : ९६४० शेतकरी बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून ते आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ९६४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब निदर्शनास आली आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.कृषी विभागाने नुकसान भरपाईचा आढावा तीन भागात घेतला आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेली शेती, शेत जमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु दुरुस्त होणारी जमीन व खरडून गेलेल्या शेतीचा समावेश आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र ७५१९.४५ हेक्टर आहे. यात ९१६३ शेतकरी बाधित झालेले आहे. यात सोयाबीनचे नुकसान २८८८.०७ हेक्टरचे झाले आहे. तर कापूस ४४७४.८९, धान २३.५१ व तूर पिकाचे नुकसान १३२.९८ हेक्टरवर झाले आहे. ३३ टक्केपक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६८०० रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाईच्या हिशेबाने ५ कोटी ११ लाख ३२ हजार २६० रुपये अपेक्षित आहे. तर शेत जमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु दुरुस्त होणारी शेतजमीन १५.६७ हेक्टर आहे. जिल्ह्यात अशा ७३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना १२२०० रुपये हेक्टरी प्रमाणे १ लाख ९१ हजार १७४ रुपये अपेक्षित आहे. तर संपूर्ण पीकच वाहून गेलेल्या म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ १०४५.८८ हेक्टर आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या २०४८ असून, ३७५०० रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळाल्यास ३ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रुपयांची अपेक्षा आहे. नुकसान झालेल्या या तीनही भागाच्या नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) व नुकसान भरपाई (रुपयात)नागपूर ग्रा. ११०६.५१                              १०६६४८७८हिंगणा ११००.९४                                    ३५८३४५८०कामठी ६                                              ४०८००मौदा ३६६.९६                                       ३१९०३७६उमरेड १५०९.९०                                 १०२६७३२०भिवापूर ६०८.४८                                  ४१४६९५२कुही ३८००.१७                                    २५८४११५६सावनेर ६६.१८                                    ४५००२४पारशिवनी ०                                             ०कळमेश्वर २.६०                                   १७६८०रामटेक १३.२६                                   ९०१६८जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने तीन तालुके व आठ मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. अशावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.विनोद पाटील, सदस्य, कृषी समिती, जि.प.

 

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ