शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नऊ कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:21 IST

जून ते आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ९६४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब निदर्शनास आली आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाने घेतला आढावा : ९६४० शेतकरी बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून ते आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ९६४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब निदर्शनास आली आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.कृषी विभागाने नुकसान भरपाईचा आढावा तीन भागात घेतला आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेली शेती, शेत जमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु दुरुस्त होणारी जमीन व खरडून गेलेल्या शेतीचा समावेश आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र ७५१९.४५ हेक्टर आहे. यात ९१६३ शेतकरी बाधित झालेले आहे. यात सोयाबीनचे नुकसान २८८८.०७ हेक्टरचे झाले आहे. तर कापूस ४४७४.८९, धान २३.५१ व तूर पिकाचे नुकसान १३२.९८ हेक्टरवर झाले आहे. ३३ टक्केपक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६८०० रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाईच्या हिशेबाने ५ कोटी ११ लाख ३२ हजार २६० रुपये अपेक्षित आहे. तर शेत जमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु दुरुस्त होणारी शेतजमीन १५.६७ हेक्टर आहे. जिल्ह्यात अशा ७३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना १२२०० रुपये हेक्टरी प्रमाणे १ लाख ९१ हजार १७४ रुपये अपेक्षित आहे. तर संपूर्ण पीकच वाहून गेलेल्या म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ १०४५.८८ हेक्टर आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या २०४८ असून, ३७५०० रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळाल्यास ३ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रुपयांची अपेक्षा आहे. नुकसान झालेल्या या तीनही भागाच्या नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) व नुकसान भरपाई (रुपयात)नागपूर ग्रा. ११०६.५१                              १०६६४८७८हिंगणा ११००.९४                                    ३५८३४५८०कामठी ६                                              ४०८००मौदा ३६६.९६                                       ३१९०३७६उमरेड १५०९.९०                                 १०२६७३२०भिवापूर ६०८.४८                                  ४१४६९५२कुही ३८००.१७                                    २५८४११५६सावनेर ६६.१८                                    ४५००२४पारशिवनी ०                                             ०कळमेश्वर २.६०                                   १७६८०रामटेक १३.२६                                   ९०१६८जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने तीन तालुके व आठ मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. अशावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.विनोद पाटील, सदस्य, कृषी समिती, जि.प.

 

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ