शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या विळख्यात राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : उमरेड-वरोरा या १०० किमी अंतराच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून, या महामार्गाच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिचाळा : उमरेड-वरोरा या १०० किमी अंतराच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून, या महामार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम तीन वर्षांत पूर्णत्वास नेण्यात आले. दाेन कंत्राटदार कंपन्यांनी या मार्गावरील पूल, राेडलगतच्या नाल्या, बसथांबे, प्रवासी निवारे, मैलाचे दगड, गाव व दिशादर्शक फलक आदी कामे पूर्ण केली. परंतु, काही गावांमध्ये प्रवासी निवारे व इतर महत्त्वाच्या सुविधांची निर्मिती करण्यात न आल्याने हा महामार्ग आजही समस्यांच्या विळख्यातच अडकला आहे.

या महामार्गाच्या कामाचे कंत्राट एस. एम. एस. कन्स्ट्रक्शन आणि एस. ए. सावंत कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले हाेते. या दाेन्ही कंपन्यांनी युद्धपातळीवर महामार्गाचे काम पूर्ण केले. त्यांनी महामार्गावरील पुलांच्या बांधकामासाेबत प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती, सूचना व दिशादर्शक फलक लावणे ही कामेही केलीत. या महामार्गावरून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुमासाेबतच माेठमाेठे दगड टाकले आहेत. या दगडांमुळे जनावरांना दुखापत हाेत असून, दुचाकी वाहने घसरून अपघात हाेत आहेत.

उमरेड-मालेवाडा या १८ किमी मार्गाचे काम एस. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीने केले असून, कंपनीने या मार्गावरील जुने पूल ताेडून त्या ठिकाणी नवीन पुलांचे बांधकाम करणे अपेक्षित हाेते. यात मालेवाडा परिसरातील दाेन व चिचाळा शिवारातील एका पुलाचा समावेश आहे. कंपनीने चिचाळा शिवारातील जुन्याच पुलाची डागडुजी करून त्याला नवीन रुप दिले आहे. हा पूल मजबूत असल्याने नवीन पुलाचे बांधकाम केले नसल्याचे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वास्तवात, या पुलाचे बांधकाम ३० वर्षांपूर्वी करण्यात आले.या पुलाच्या बांधकामात घाेळ करण्यात आल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. मालेवाडा शिवारातील दाेन्ही पुलांचे नव्याने बांधकाम करण्यात आले.

...

प्रवासी निवाऱ्यांचा अभाव

या महामार्गावरील बहुतांश गावांमध्ये प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; मात्र ती करताना चिचाळा, पाहमी व गरडापार या तीन गावांना वगळण्यात आले. ती का वगळण्यात आली, हे कळायला मार्ग नाही. याबाबत अधिकारी बाेलायला तयार नाहीत. त्यामुळे या गावांमधील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना राेडलगत ऊन, थंडी व पावसात उभे राहून बस व इतर प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागते.

...

नळाचे पाणी राेडवर

गरडापार येथे नळाचे पाणी महामार्गावरून सतत वाहत असते. त्यामुळे एकीकडे पाण्याचा अपव्यय हाेत असून, राेडवरील पाणी अपघाताला निमंत्रण देत आहे. या ठिकाणी राेडलगत नाल्यांची निर्मिती केली असली तरी चुकीच्या कामामुळे नळाचे पाणी नालीऐवजी राेडवरून वाहते. पाहमी येथे नाल्यांची निर्मिती न केल्याने राेडवरील पावसाचे पाणी गावात शिरण्याची व गावाला तलावाचे स्वरूप प्राप्त हाेण्याची शक्यता बळावली आहे.