शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नाव गांधीबाग पण गांधींचेच अस्तित्व नाही

By admin | Updated: January 30, 2015 00:54 IST

इतिहासाच्या पोटात अनेक सत्य दडली असतात पण प्रत्येकवेळी खरा इतिहास समोर येत नाही. माणसे संपतात, काळ बदलतो पण इतिहास निमुटपणे साऱ्या नोंदी करीत असतो.

राजेश पाणूरकर - नागपूरइतिहासाच्या पोटात अनेक सत्य दडली असतात पण प्रत्येकवेळी खरा इतिहास समोर येत नाही. माणसे संपतात, काळ बदलतो पण इतिहास निमुटपणे साऱ्या नोंदी करीत असतो. इतिहासाकडे गंभीरपणे पाहिले आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक रंजक आणि थक्क करणाऱ्या नोंदी, आठवणी आपल्याला सापडतात आणि आतापर्यंत आपण समजत होतो, ते काही तरी वेगळे असल्याचाही प्रत्यय येतो. एखाद्या वस्तीचे, स्थळाचे, शहराचे नावही तसे का आहे, याचाही इतिहास असतोच पण आपण धावपळीच्या जीवनात इतके खोलात जात नाही. नागपुरातही सेंट्रल एव्हेन्युवर गांधीबाग उद्यान आहे. या उद्यानाचे नाव म. गांधींच्या नावाने गांधीबाग झाले आहे पण येथे गांधींजींचे अस्तित्वच दिसत नाही. या उद्यानाला गांधीबाग नाव पडण्यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे यत्न आहेत. राष्ट्रसंतांनीच हे उद्यान उभारले, स्वच्छता केली आणि या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. म. गांधी यांच्या नावाने असलेले हे उद्यान आहे पण येथे म. गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म. गांधी यांचे अनुयायी होते. ३० जानेवारी १९५३ रोजी म. गांधी यांचा स्मृतिदिन नागपुरात मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला. राष्ट्रसंतांनीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रसंतांनी गांधीजींची पुण्यतिथी त्यांच्या विचारांवर अमल करून साजरी करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन लेंडी तलाव परिसराची निवड केली. या परिसरात त्यावेळी खूप घाण होती आणि तेथे छोटासा तलाव होता. लोक येथे शौचासाठी येत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अनारोग्य पसरले होते. म. गांधी स्वच्छतेचे पुजारी होते. परिसर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या याच विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रसंतांनी लेंडी तलाव परिसराची निवड म. गांधींच्या पुण्यतिथीसाठी केली आणि आपल्या शिष्यपरिवारासह या तलावाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रसंतांनी १५०० स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा तलाव परिसर स्वच्छ केला. यासाठी सर्व नागरिकांनी येथे श्रमदान केले. त्यांनी दलदलीने आणि घाणीने भरलेला हा तलाव बुजविला आणि परिसर स्वच्छ केला. तेथे वृक्षांची लागवड केली आणि उद्यान तयार झाले. जो परिसर घाण आणि दुर्गंधीने भरला होता तेथे मनाला आल्हाद देणारे उद्यान तयार झाले. ज्या परिसरात नाक दाबून जावे लागत होते तेथे आता शांतता, स्वच्छता दिसायला लागली. गांधीजींना शांतता प्रिय होती. त्यामुळेच राष्ट्रसंतांनी या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. तेव्हापासून या उद्यानाला आणि परिसरालाही गांधीबाग असेच नाव अद्यापपर्यंत आहे. पण येथे अजूनही म. गांधींचा पुतळा स्थापन करण्यात आला नाही. महापालिकेचेही या बाबीकडे दुर्लक्ष झाले. गांधीजींच्या नावाने असणाऱ्या उद्यानात गांधीजींनाच शोधण्याची वेळ येथे आली आहे. गांधीबाग हे नामकरण करण्यापूर्वी राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने २९ जानेवारी १९५३ रोजी एका प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आज गांधीजींची पुण्यतिथी आहे. पण गांधीबागेत मात्र म. गांधींचे अस्तित्व शोधूनही सापडत नाही. गांधीजींच्या पुण्यतिथीसाठी त्यावेळी प्रांतीय सरकार, सुधार प्रन्यास, सी. पी. अँड बेरार प्रॉपर्टीज कंपनी आणि सर्व धर्माच्या नागरिकांनी सहकार्य केले होते. टेलिफोन, पोस्ट आॅफिस, दिव्यांचे खांब, मॅजिस्ट्रेट निवास, कार्यकर्त्यांसाठी तंबू, राहुटी, उपयुक्त दुकाने, प्रदर्शन अशी व्यवस्था येथे सर्वांच्या सहकार्याने करण्यात आली. कार्यक्रमासाठी मान्यवरांचे संदेशही आले. यात सरदार वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, कैलाशनाथ काटजू, काकासाहेब गाडगीळ, डॉ. पट्टाभिसीतारामय्या, स्वामी रामानंदतीर्थ, महावीर त्यागी, लोकनायक बापूजी अणे, जे. सी. कुमारप्पा, सेठ गोविंददास, राजकुमारी अमृत कौर आदींचा समावेश होता. राष्ट्रसंतांचे गुरु योगीराज स्वामी, सीतारामदास महाराज, संत दामोदरदास महाराज हे दोन आठवड्यांपूर्वी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. वामनराव लोहकरे, रघुनाथराव पत्तरकिने यांनीही यावेळी हजेरी लावली. प्रभातफेरी ज्या मार्गावरून नेण्यात आली, त्या मार्गावर सडासंमार्जन करण्यात आले, रांगोळ्या काढण्यात आल्या. प्रभातफेरीत सायकलस्वार स्वयंसेवक सहभागी झाले. स्वागतद्वार उभारण्यात आले, भगवे फेटे घातलेली भजन मंडळे राष्ट्रीय भजने सादर करीत होती. मुख्य रथावर स्वामी सीतारामदास महाराज आरुढ झाले आणि मागे म. गांधी यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले. ३० जानेवारी रोजी गांधी स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शक भाषणे, सामुदायिक ध्यान, व्यायाम, योगासने आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन तीन दिवस करण्यात आले होते. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने आणि म. गांधी यांच्या विचारातून या परिसराचा कायापालट झाला. पण या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा येथे उभारण्यात मात्र आमचाच नतद्रष्टपणा आड आला, असे म्हणावे लागेल. महापालिकेने पुढाकार घ्यावा१९५३ साली गांधीबागेत झालेल्या कार्यक्रमाचे आपण स्वत: एक साक्षीदार आहोत आणि त्याची छायाचित्रेही आपल्याजवळ उपलब्ध आहेत. राष्ट्रसंतांनीच या परिसराचे नाव गांधीबाग असे ठेवले. संपूर्ण परिसरात सायकलने फिरुन ते पाहणी करायचे. आज गांधीबागेत मात्र राष्ट्रसंत आणि म. गांधी यांचा उल्लेखही नसल्याची खंत वाटते. महापालिकेजवळ यासंदर्भातील प्रस्ताव उपलब्ध आहेत. महापालिकेने पुढाकार घेऊन राष्ट्रसंत आणि म. गांधी यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याचा निर्णय म. गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त करावा, असे मत गजानन भिसेकर यांनी व्यक्त केले.