शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर १३२.५७ कोटींचा बोजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:37 IST

आर्थिक संकटातील नागपूर महापालिकेच्या तिजोरीची चावी प्रदीप पोहाणे यांच्याकडे दिली आहे. परंतु ही जबाबदारी वाटते इतकी सोपी नाही.

ठळक मुद्देजुन्या विकास कामासाठी समायोजनाची तयारी स्थायी समिती अध्यक्षांच्या अर्थसंकल्पावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक संकटातील महापालिकेच्या तिजोरीची चावी प्रदीप पोहाणे यांच्याकडे दिली आहे. परंतु ही जबाबदारी वाटते इतकी सोपी नाही. आधीच पोहाणे यांच्याकडे कालावधी कमी आहे, त्यात महापालिका आधीच आर्थिक अडचणीत आहे. त्यात आधीच्या स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या परंतु अर्थसंकल्पात तरतूद नसलेल्या १३२.५७ कोटींच्या विकास कामांसाठी नवीन अर्थसंकल्पात तरतूद करावयाची आहे. यामुळे झोन स्तरावरील विकास कामासासाठी फारसा निधी उपलब्ध होणार नाही.महापालिकेच्या दहा झोनच्या सहायक आयुक्तांनी सादर केलेल्या ताळेबंदावरून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यकाळात झोन स्तरावर कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. परंतु जुन्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूदच करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने नवीन अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. झोनतर्फे ४६.३६ कोटी रस्ते, सिवरेज लाईन, चेंबरची सफाई आदी कामांना मंजुरी दिली आहे. उर्वरित रक्कम अन्य मोठ्या फाईलची आहे. अनेक कामांचे कार्यादेश देण्यात आले. परंतु निधी नसल्याने कामे सुरू करता आलेली नाही. अशा कामांसाठी नवीन अर्थसंकल्पात तरतूद करण्याची तयारी आहे. अशा परिस्थितीत पोहाणे यांना नवीन अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.स्थायी समितीकडे वेळ कमी आहे. २३ मे पर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे. तोपर्यंत स्थायी समितीला कोणत्याही फाईल मंजूर करता येणार नाही. जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होईल. पावसाळ्यात कामे बंद असतात. त्याच दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू होतील. यामुळे विद्यमान स्थायी समितीला कामासाठी मोजकाच कालावधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.वित्त विभाग अपशयी ठरलामहापालिकेची आर्थिक स्थिती बिघडण्याला प्रामुख्याने वित्त विभाग जबाबदार आहे. गेल्या वित्त वर्षात अपेक्षानुरूप उत्पन्न झालेले नाही. जोर लावल्यानंतरही २०१७.७५ कोटींचाच महसूल आला. त्यातच वित्त विभागाच्या गलथान कारभारामुळे प्रथमच आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोव्हेंबर २०१८ पर्यंतचीच बिले सादर करता आली. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यानच्या कालावधीत १५० कोटींची बिले स्वीकारता आलेली नाहीत. आवश्यक खर्चासाठी ६० ते ७० कोटींचा निधी महापालिकेला उभारता आलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांची जुनी देणी व आवश्यक खर्चासाठी लागणारी रक्कम स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात समायोजित केली जाणार आहे. त्यामुळे प्रस्तावित अर्थसंकल्पात नवीन योजना राबविता येणार नाही.नवीन कामे रखडलीमार्च अखेरपर्यंत बिल स्वीकारले जाते, असा दरवर्षीचा अनुभव आहे. परंतु यावेळी नोव्हेंबर २०१८ पर्यंतचीच बिले स्वीकारण्यात आली. डिसेंबर ते मार्च दरम्यानची बिले नवीन अर्थसंकल्पात समायोजित केली जाणार आहे. वित्त विभागाच्या गलथान कारभारामुळे महापालिका आर्थिक अडणीत असल्याचे महापालिका कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांनी सांगितले. निधी नसल्याचे कंत्राटदार नवीन कामे घेत नसल्याची माहिती त्यांनी दिली.विशेष अनुदान व जीएसटीकडून आशाजीएसटी अनुदान ८६.५० कोटीवरून ९३.०५ कोटी करण्यात आले आहे. १५० कोटींचे विशेष अनुदान शासनाने जारी केल्याची बाब महापालिकेसाठी आशादायी ठरली आहे. जीएसटी अनुदानातून वर्षाला १११६ कोटी मिळतील. या निधीतून शहरातील काही विकास कामे मार्गी लागण्याची आशा आहे. प्रदीप पोहाणे यांना नवीन अर्थसंकल्पात नवीन योजना राबविण्यासाठी फारसा वावच शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका