शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगात नागपूरने मारली बाजी

By admin | Updated: April 29, 2016 02:57 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) होय.

नागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) होय. या योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्याने भरीव काम करीत राज्यात बाजी मारली आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात १,४९,९८२ कुटुंबांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. १, ४५,७५७ कुटुंबांना जॉबकार्ड मिळाले असून ३३,८५१ कुटुंबाला प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक कामांमध्ये नागपूर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, हे विशेष. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नागपूर जिल्हा हा मजुरांच्या आधार जोडणीमध्ये राज्यात पहिल्या कमांकावर आहे. जिल्ह्यातील ९९.८० टक्के मजुरांचे आधार क्रमांक काढून नरेगा वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. मनुष्य दिवस निर्मितीमध्ये सुद्धा नागपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शासनाकडून १४.४५ दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने २४.५९ दिवस रोजगार उपलब्ध करून देत १७० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ९ टक्के, अनुसूचित जमातीसाठी २९ टक्के आणि महिलांना ४५ टक्के रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत १३६३ सिंचन विहिरी, १६३ पांदण रस्ते, ३७५ सिमेंट रस्ते, ९३,३०० वृक्ष लागवड आणि १५५० वैयक्तिक शौचालयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. २०१५-१६ मध्ये सिंचन विहिरींची ७०० कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात १५९९ कामांना सुरुवात झाली. १५ कोटी २३ लाख ९ हजार रुपये खर्च करण्यात आले. २०१५-१६ पूर्वी सुरु करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामापैकी ३७९ कामे या वर्षी पूर्ण करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत व्यतिरिक्त इतर यंत्रणा उदाहरणार्थ जलसंधारण विभाग, कृषी विभाग इत्यादींना सिंचन विहिरींच्या कामे सोपविण्यात आली हाती. २०१५-१६ मध्ये १६३ पांदण रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून ही सर्व कामे २०१६ च्या पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येतील. सिमेंट रस्त्यांची ३७५ कामे हाती घेऊन ती मार्च महिन्यातच पूर्ण करण्यात आली. सिमेंट रस्त्याच्या कामामुळे ग्रामीण भागात २५ कि.मी.चे लांबीचे रस्ते तयार होऊन स्थायी मालमत्ता निर्माण झाली व ग्रामस्थांना ये-जा करणे सुलभ झाले. नागपूर जिल्ह्यात योजनेच्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच अकुशल खर्चाचे प्रमाण १२ टक्क्याने वाढले आहे. सध्या अकुशल व कुशलचे प्रमाणे ६३ व ३७ इतके आहे. (प्रतिनिधी) मजुरी प्रदानातही प्रथम क्रमांकावर नागपूर जिल्हा हा मजुरीच्या प्रदानातही राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. विहित मुदतीत मजुरी प्रदानामध्ये नागपूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या ६६.४८ टक्के प्रदाने विहित मुदतीत अदा करण्यात येतात. १०० टक्के प्रदाने विहित मुदतीत करण्याकरिता प्रयत्न केले जात आहे. अंतर्गत कामांच्या ‘असेट मॅपिंग’ आणि जीआयएस मॅपिंगमध्ये सुद्धा नागपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.