शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

माहुतांचा जहालपणा नडला!

By admin | Updated: June 1, 2015 00:20 IST

समर्थ हत्ती मृत्यू : ‘भीम’बाबत काळजी घेणे गरजेचे, पट्टीत खिळे मारून प्रशिक्षण

अनंत जाधव -सावंतवाडी --जिल्ह्यात दुसऱ्यांदा राबविलेली हत्ती पकड मोहीम यशस्वी झाल्यानंतर वनविभागाने हत्तींना सिंधुदुर्गमध्येच प्रशिक्षित करण्याचे केलेले धाडस वनविभागाच्या अंगलट आले आहे. मुक्तसंचार करणाऱ्या हत्तीला कैद्यासारखे बंदिवान करून त्याला माहुतांनी दिलेले जहाल प्रशिक्षणही हत्तीच्या मृत्यूला तेवढेच कारणीभूत आहे. पट्टीत खिळे मारून त्यांच्या पायावर मारले जायचे. पायाच्या जखमेतून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. जखमाच समर्थच्या प्राणावर बेतल्या. त्यामुळे आता भीम या हत्तीला येथून हलवणे गरजेचे बनले आहे.जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी तत्कालीन उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी हत्ती पकड मोहीम राबविली होती. मोहीम संपूर्ण महाराष्ट्रासाठी उत्सुकतेचा विषय होता, पण मोहिमेवेळी पकडलेल्या हत्तीला औषधाचा जादा डोस लागला आणि तो दोन दिवसांनी मृत पावला. त्यानंतर हत्ती पकड मोहीमच थांबविली होती. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी मागचा इतिहास विसरून पुन्हा एकदा नव्या दमाने मोहीम राबविण्याचे निश्चित केले. यासाठी कर्नाटकातून खास चार हत्तीही आणण्यात आले. या हत्तींच्या सहाय्याने माणगाव खोऱ्यातील हत्ती पकड मोहीम यशस्वीही केली. पण या मोहिमेला गालबोट लागले ते पकडलेल्या हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी आंबेरी येथे ठेवण्यात आले तेव्हा. ना सुविधा ना पुरेशी जागा, योग्य हवामान. याचा सारासार विचार केला तर हत्ती प्रशासनाच्या दुर्लक्षतेचेच बळी ठरले.समर्थच्या डाव्या पायाला जखम झाली होती. पायात ट्रेस होता. त्यामुळेच तो मृत पावला. अशी कारणे प्राथमिक वैद्यकीय अहवालात डॉक्टरांनी दिली आहेत. मुख्य अहवाल दोन दिवसात आल्यानंतर खरे कारण पुढे येईल. - एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक ५क्रॉलसाठीची जागा तोकडीजंगली हत्ती हा मुक्तपणे संचार करणारा प्राणी. त्याला अचानक ५ बाय ५ च्या क्रॉलमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे त्याच्यासाठी ती जागा अतिशय तोकडी होती. त्यातच या हत्तींना सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळत नव्हते. हत्तीच्या खाद्याबाबतही अनेक तक्रारी होत्या. या सर्व कारणांमुळे हत्तींचे जीवन बंदिवानासारखे झाले होते. त्यामुळेच गणेश व समर्थचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.पहिल्या हत्तीच्या मृत्यूनंतर शासनाकडून दखल नाहीगणेश हत्तीचा १० एप्रिलला मृत्यू झाला. तेव्हा वनविभागाने हत्ती इतरत्र हलविणे गरजेचे होते. समर्थचे आजारपणही वाढत चालेले होते. वन विभागाने तसे शासनाला कळविलेही होते, पण आपले मरण दुसऱ्यावर ढकलतात या युक्तीप्रमाणे इतर अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली नाही. त्यामुुळे आज दुसऱ्याही हत्तीला गमावण्याची वेळ आली आहे. माहुतांचे जहाल प्रशिक्षणकर्नाटकमध्ये जंगली हत्तींना प्रशिक्षित करताना त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते तसेच प्रशिक्षण आंबेरीत पकडून ठेवलेल्या हत्तींना दिले होते. १६ फेबु्रवारीला तिसरा हत्ती पकडला, तेव्हापासून या माहुतांकडून प्रशिक्षण सुरू झाले. हे प्रशिक्षण मुक्त वातावरणात माणसावर अधिराज्य गाजवणाऱ्या हत्तींसाठी जीवघेणे ठरले. काठीला लांब खिळे मारून ते हत्तीच्या अंगावर मारायचे. यातच हृदयविकाराने गणेशचा मृत्यू झाला, तर समर्थच्या पायावर झालेल्या जखमा बऱ्याच झाल्या नाहीत व त्याचाही मृत्यू ओढवला.