शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींनी राष्ट्रीय चेतना जागविली

By admin | Updated: January 2, 2015 00:52 IST

महात्मा गांधी हे धर्म, भाषा, क्षेत्र, लिंग अशा स्वरूपाचा भेदभाव नाकारून राष्ट्रीय चेतना जागविली, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.राम पुनियानी (आयआयटी पवई) यांनी व्यक्त केले.

राम पुनियानी : ‘महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरचा भारत’ यावर परिसंवाद नागपूर : महात्मा गांधी हे धर्म, भाषा, क्षेत्र, लिंग अशा स्वरूपाचा भेदभाव नाकारून राष्ट्रीय चेतना जागविली, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.राम पुनियानी (आयआयटी पवई) यांनी व्यक्त केले. नागपूर जिल्हा सर्वोदय मंडळतर्फे गुरुवारी झाशी राणी चौकातील हिंदी मोर भवन येथे ‘महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरचा भारत’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पुनियानी यांनी महात्मा गांधी यांचे विचार आणि देशाच्या ऐतिहासिक व वर्तमान परिस्थितीवर सखोल मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक दत्तात्रय बरगी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार व्यासपीठावर उपस्थित होते. देशात इंग्रजांसोबत सामाजिक बदल, तर महात्मा गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादाचे आगमन झाले. इंग्रजकाळात उद्योजक, कामगार व सुशिक्षित वर्ग उदयास येऊन राजा, जमीनदार आदींची शक्ती कमी व्हायला सुरुवात झाली. १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राजे-जमीनदारांनी स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी धर्माचा प्रचार सुरू केला. त्यावेळी हिंदू व मुस्लीम राजे सोबत होते. इंग्रजांनी त्यांच्यात दुही निर्माण केल्यानंतर धार्मिक संघटना तयार झाल्या. महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही संघटना होत्या, पण त्यात राष्ट्रीयत्वाची भावना होती. राजा हिंदू असो वा मुस्लीम शोषण, जाती व्यवस्था व लिंगाच्या आधारावर भेदभाव कायम होता. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय चेतना जागविण्याचे कार्य केले, असे पुनियानी यांनी सांगितले.१९२० पर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा लढा उच्चवर्गापर्यंत सीमित होता. महात्मा गांधी यांनी हा लढा तळागाळापर्यंत पोहोचविला. महात्मा गांधींवर मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप केला जातो. परंतु, राष्ट्रीयत्वाच्या विचारापुढे धार्मिक बंधनांना कधीच महत्त्व नसते. महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, साने गुरुजी आदी महापुरुष धर्माच्या नाही, तर धार्मिक मूल्यांच्या आधारावर जगत होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी इस्लाम जोडणे शिकवितो तोडणे नाही, असे सांगून ठेवले आहे. साने गुरुजी यांनी ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ म्हटले आहे, अशी माहिती पुनियानी यांनी दिली. मंडळाचे सचिव रवी गुडधे यांनी संचालन केले.नथुराम गोडसेचा उदोउदो थांबवामहात्मा गांधी यांची शरीराने हत्या झाली आहे, पण त्यांच्या विचारांची हत्या होऊ नये यासाठी नथुराम गोडसेचा उदोउदो थांबला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदू महासभेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलो, असे गोडसेने न्यायालयात सांगितले होते. परंतु, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या काळातही तो संघात सक्रिय होता याचे पुरावे आहेत.(प्रतिनिधी)