शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 18:24 IST

Kangana Ranaut : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बंटोगे तो कटोगे' या घोषणेवर कंगना रणौत यांनी भाष्य केलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकीचा जोरात प्रचार सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बंटोगे तो कटोगे' या घोषणेचेही जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मंडी, हिमाचल प्रदेशमधील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकात्मतेत बळ असते, असे लहानपणापासून वाचत आलो आहे, असे कंगना यांनी म्हटलं आहे. मात्र त्याआधी याविषयी बोलताना कंगना यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. त्यामुळे आता कंगना रणौत यांच्या या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला आहे. मात्र नागपूर येथे माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांच्या बंटोगे तो कटोगे या घोषणेवर अजब विधान केले. या घोषणेबाबत कंगना आधी म्हणाल्या की, बंटेंगे तो कटेंगे किंवा वोट जिहाद असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. नंतर जेव्हा त्यांना सांगण्यात आले की ही कथा योगी आदित्यनाथ यांची घोषणा होती तेव्हा कंगना यांनी ही एकतेची हाक आहे, असं म्हटलं.

"बंटोगे तो कटोगें हा आमचा मुद्दा नाही"

 "वोट जिहाद किंवा बंटोगे तो कटोगें हे विरोधकांचे मुद्दे आहेत, आमचे नाहीत. विरोधी पक्षांनी स्वतःची कबर खोदली आहे. भाजप आपल्या कामाच्या जोरावर जिंकत आहे. तुम्ही नमूद केलेले हे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. या विरोधकांनी स्वतःची कबर खोदली आहे. जाती-धर्माच्या आधारावर फूट पाडणे हे विरोधकांचे काम आहे. आमच्या सरकारची पुनरावृत्ती होईल. विरोधकांकडू खळबळ माजवली जात आहे पण लोक त्याकडे लक्षही देत ​​नाहीत," असं कंगना यांनी सुरुवातीला म्हटलं.

त्यानंतर कंगना यांनी योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बंटोगे तो कटोगें या घोषणेबाबत विचारण्यात आले. याबाबत काँग्रेस आक्रमक असून भाजपला देशाचे विभाजन करायचे आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे, असं माध्यमांनी विचारलं. यावर बोलताना "ही एकतेची हाक आहे. एकता हीच आपली ताकद आहे, असे आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. जेव्हा आपण विभागले जाऊ तेव्हा आपण असुरक्षित होऊ. कुटुंबातही आपण म्हणतो की कुटुंब एकत्र असावे. त्याचप्रमाणे देशानेही एकत्र राहिले पाहिजे. आमचा पक्ष सनातनी पक्ष आहे. आमच्या पक्षाला पाकव्याप्त काश्मीरचा समावेश करायचा आहे आणि विरोधकांचा फूट पाडण्याचा डाव फसला आहे, असं कंगना यांनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरBJPभाजपाKangana Ranautकंगना राणौत