शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 18:24 IST

Kangana Ranaut : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बंटोगे तो कटोगे' या घोषणेवर कंगना रणौत यांनी भाष्य केलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकीचा जोरात प्रचार सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बंटोगे तो कटोगे' या घोषणेचेही जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मंडी, हिमाचल प्रदेशमधील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकात्मतेत बळ असते, असे लहानपणापासून वाचत आलो आहे, असे कंगना यांनी म्हटलं आहे. मात्र त्याआधी याविषयी बोलताना कंगना यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. त्यामुळे आता कंगना रणौत यांच्या या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला आहे. मात्र नागपूर येथे माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांच्या बंटोगे तो कटोगे या घोषणेवर अजब विधान केले. या घोषणेबाबत कंगना आधी म्हणाल्या की, बंटेंगे तो कटेंगे किंवा वोट जिहाद असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. नंतर जेव्हा त्यांना सांगण्यात आले की ही कथा योगी आदित्यनाथ यांची घोषणा होती तेव्हा कंगना यांनी ही एकतेची हाक आहे, असं म्हटलं.

"बंटोगे तो कटोगें हा आमचा मुद्दा नाही"

 "वोट जिहाद किंवा बंटोगे तो कटोगें हे विरोधकांचे मुद्दे आहेत, आमचे नाहीत. विरोधी पक्षांनी स्वतःची कबर खोदली आहे. भाजप आपल्या कामाच्या जोरावर जिंकत आहे. तुम्ही नमूद केलेले हे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. या विरोधकांनी स्वतःची कबर खोदली आहे. जाती-धर्माच्या आधारावर फूट पाडणे हे विरोधकांचे काम आहे. आमच्या सरकारची पुनरावृत्ती होईल. विरोधकांकडू खळबळ माजवली जात आहे पण लोक त्याकडे लक्षही देत ​​नाहीत," असं कंगना यांनी सुरुवातीला म्हटलं.

त्यानंतर कंगना यांनी योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बंटोगे तो कटोगें या घोषणेबाबत विचारण्यात आले. याबाबत काँग्रेस आक्रमक असून भाजपला देशाचे विभाजन करायचे आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे, असं माध्यमांनी विचारलं. यावर बोलताना "ही एकतेची हाक आहे. एकता हीच आपली ताकद आहे, असे आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. जेव्हा आपण विभागले जाऊ तेव्हा आपण असुरक्षित होऊ. कुटुंबातही आपण म्हणतो की कुटुंब एकत्र असावे. त्याचप्रमाणे देशानेही एकत्र राहिले पाहिजे. आमचा पक्ष सनातनी पक्ष आहे. आमच्या पक्षाला पाकव्याप्त काश्मीरचा समावेश करायचा आहे आणि विरोधकांचा फूट पाडण्याचा डाव फसला आहे, असं कंगना यांनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरBJPभाजपाKangana Ranautकंगना राणौत