शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 18:24 IST

Kangana Ranaut : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बंटोगे तो कटोगे' या घोषणेवर कंगना रणौत यांनी भाष्य केलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकीचा जोरात प्रचार सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बंटोगे तो कटोगे' या घोषणेचेही जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मंडी, हिमाचल प्रदेशमधील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकात्मतेत बळ असते, असे लहानपणापासून वाचत आलो आहे, असे कंगना यांनी म्हटलं आहे. मात्र त्याआधी याविषयी बोलताना कंगना यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. त्यामुळे आता कंगना रणौत यांच्या या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला आहे. मात्र नागपूर येथे माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांच्या बंटोगे तो कटोगे या घोषणेवर अजब विधान केले. या घोषणेबाबत कंगना आधी म्हणाल्या की, बंटेंगे तो कटेंगे किंवा वोट जिहाद असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. नंतर जेव्हा त्यांना सांगण्यात आले की ही कथा योगी आदित्यनाथ यांची घोषणा होती तेव्हा कंगना यांनी ही एकतेची हाक आहे, असं म्हटलं.

"बंटोगे तो कटोगें हा आमचा मुद्दा नाही"

 "वोट जिहाद किंवा बंटोगे तो कटोगें हे विरोधकांचे मुद्दे आहेत, आमचे नाहीत. विरोधी पक्षांनी स्वतःची कबर खोदली आहे. भाजप आपल्या कामाच्या जोरावर जिंकत आहे. तुम्ही नमूद केलेले हे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. या विरोधकांनी स्वतःची कबर खोदली आहे. जाती-धर्माच्या आधारावर फूट पाडणे हे विरोधकांचे काम आहे. आमच्या सरकारची पुनरावृत्ती होईल. विरोधकांकडू खळबळ माजवली जात आहे पण लोक त्याकडे लक्षही देत ​​नाहीत," असं कंगना यांनी सुरुवातीला म्हटलं.

त्यानंतर कंगना यांनी योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बंटोगे तो कटोगें या घोषणेबाबत विचारण्यात आले. याबाबत काँग्रेस आक्रमक असून भाजपला देशाचे विभाजन करायचे आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे, असं माध्यमांनी विचारलं. यावर बोलताना "ही एकतेची हाक आहे. एकता हीच आपली ताकद आहे, असे आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. जेव्हा आपण विभागले जाऊ तेव्हा आपण असुरक्षित होऊ. कुटुंबातही आपण म्हणतो की कुटुंब एकत्र असावे. त्याचप्रमाणे देशानेही एकत्र राहिले पाहिजे. आमचा पक्ष सनातनी पक्ष आहे. आमच्या पक्षाला पाकव्याप्त काश्मीरचा समावेश करायचा आहे आणि विरोधकांचा फूट पाडण्याचा डाव फसला आहे, असं कंगना यांनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरBJPभाजपाKangana Ranautकंगना राणौत