शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार मुलांना फूटपाथवर अ, आ, ई चे धडे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:09 IST

निशांत वानखेडे नागपूर : ‘आपण किती जगलाे यापेक्षा कसे जगलाे आणि जाताना जगाला काय देऊन गेलाे’, हे जास्त महत्त्वाचे ...

निशांत वानखेडे

नागपूर : ‘आपण किती जगलाे यापेक्षा कसे जगलाे आणि जाताना जगाला काय देऊन गेलाे’, हे जास्त महत्त्वाचे आहे. ‘उपाय’ संस्थेने नुकताच १२ वा स्थापना दिवस साजरा केला. फूटपाथवर वाढलेल्या, जगलेल्या, शाळेची इमारतही न पाहिलेल्या निरागस मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडण्याचा ताे वर्धापन दिन हाेय. नागपूर जिल्ह्यातील माैद्यात सुरू झालेल्या फूटपाथ स्कूलचे राेपटे देशभरात रुजविण्याचा आणि ११००० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्याचा हा प्रवास आहे. ताे जेवढा अतुलनीय तेवढाच मानवीयही आहे.

एनटीपीसी माैदा येथे सेवारत अभियंता वरुण श्रीवास्तव यांना शाळेत न जाता भटकणाऱ्या मुलांना पाहून काहीतरी करण्याची इच्छा झाली. काेण काय म्हणेल, असा मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन शिकविणे सुरू केले. त्यांचे अनुकरण करून काही संवेदनशील तरुण त्यांच्याशी जुळले आणि नागपुरात महाराजबाग राेडवर खेळणी विकणाऱ्यांच्या मुलांसाठी पहिली फूटपाथ शाळा सुरू झाली. महाविद्यालयीन, नाेकरीपेशा तरुण येथे सायंकाळी येऊ लागले आणि या मुलांसाेबत वेळ घालवून त्यांना अ, आ, ई चे धडे देऊ लागले. पाहता-पाहता तरुण जुळत गेले. मग माऊंट राेड, पागलखाना चाैक, सक्करदरा, वर्धमाननगर, लक्ष्मीनगर असे एक-एक करीत ११ फूटपाथ स्कूल शहरात सुरू झाले. शिक्षण फूटपाथपर्यंत या मुलांना शाळांपर्यंत पाेहोचविण्याचे कामही या तरुणांनी केले. या काळात वरुण यांच्या शिकविण्याने १० वीपर्यंत गेलेल्या मुलांनी त्यांच्या गावी शाळा सुरू केल्या. असे ११ सेंटर माैद्याच्या आसपासच्या गावात आज सुरू आहेत.

ही शाळा नागपूरपुरती मर्यादित राहिली नाही. पुण्यातील तरुणांनी ‘उपाय’शी जुळून तेथे केंद्र सुरू केले. पुढे गुडगाव, बंगलोर, दिल्ली व आता मध्यप्रदेशच्या गादरबारा येथे फूटपाथ शाळा सुरू झाली. असे ४० केंद्र आज देशात कार्यरत असून २५० च्यावर स्वयंसेवक मुलांना शिकविण्याचे काम करतात. या फूटपाथ शाळांमधून १२ वर्षांत ११ हजार मुले शिकून निघून गेली. काही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, काही उच्च शिक्षणापर्यंत पाेहोचली व काही नाेकरीवरही लागली. काही खेळांमध्ये उल्लेखनीय ठरली आहेत.

काेराेना काळातही सेवा

काेराेनाकाळात ‘उपाय’च्या कार्यकर्त्यांनी ३५ हजार लाेकांना अन्नधान्य पुरवठा केला. ६०० लाेकांचे लसीकरण केले. ७३० लाेकांना वैद्यकीय सुविधा पुरविली. १० ऑक्सिजन सहायता केंद्र चालविले

देशात आठ दशलक्ष मुले शाळेच्या बाहेर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. कुणीतरी जबाबदारी घेतली तर एक-एक मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकताे. ही मुले शाळेत जाऊ शकत नाही तर शाळा त्यांच्यापर्यंत पाेहोचविता येते. थाेडा विचार करून या निरागस मुलांसाठीही वेळ काढायला हवा.

- वरुण श्रीवास्तव, संस्थापक, ‘उपाय’