शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उपराजधानीत कार्डधारकांना होतोय अपुरा धान्य पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 1:21 PM

सरकारने तीन महिन्याचे धान्य देण्याची घोषणा केली. परंतु नंतर निर्णय मागे घेत एक महिन्याचे धान्य उपलब्ध करून दिले. मात्र कार्डधारकांना १ महिन्याचे पर्याप्त धान्य सुद्धा उपलब्ध होत नसल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देकार्डधारकांना धान्याची पावती मिळत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने तीन महिन्याचे धान्य देण्याची घोषणा केली. परंतु नंतर निर्णय मागे घेत एक महिन्याचे धान्य उपलब्ध करून दिले. मात्र कार्डधारकांना १ महिन्याचे पर्याप्त धान्य सुद्धा उपलब्ध होत नसल्याचे दिसते आहे. कार्डधारकांना धान्याची पावती दिली जात नाही. धान्य कमी असल्याचा हवाला देत कमीच धान्य दिले जात आहे. जिल्हाधिकारी ग्राहक कल्याण समितीने सुद्धा यासंदर्भातील तक्रारी येत असल्याचा खुलासा केला आहे. नागरिकांकडून रेशन दुकानातून धान्याची काळाबाजारी केली जात असल्याची ओरड होत आहे.ग्राहक कल्याण समितीला अनेक लोकांनी रेशन केंद्रावरील काळाबाजारी होत असल्याचे व्हिडिओ पाठविले आहे. कार्डधारकांना पावती देणे अनिवार्य असताना पावती दिली जात नाही. स्टॉक कमी असल्याचे सांगून कमीच धान्य दिले जात आहे. पावती न देता धान्य वितरणात गडबड करून काळाबाजारी केली जात आहे. टेका नाका येथील एका रेशन केंद्रावर एका महिला कार्डधारकाला ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ देण्यात आला. त्यांना पावती सुद्धा दिली नाही. जेव्हा दुकानदाराकडून पावती मागण्यात आली तेव्हा त्यात २१ किलो गहू, १४ किलो तांदूळ व १ किलो डाळ वितरित केल्याचे निदर्शनास आले. त्या महिलेने सांगितले की, त्यांना दर महिन्याला एवढेच धान्य दिले जाते. यासंदर्भात अन्न व पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार