शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाेबतच विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी इयत्ता दहावी व ...

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाेबतच विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी क्रीडा गुण दिले जातात. काेराेना संक्रमणामुळे वर्षभरापासून शालेय क्रीडा स्पर्धांचे आयाेजनच करण्यात आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना यावर्षी क्रीडा गुण कसे आणि काेणत्या आधारावर दिले जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी २० क्रीडा गुण दिले जातात. काेराेना संक्रमणामुळे वर्षभरापासून शाळा बंद असून, शालेय क्रीडा स्पर्धांचेही आयाेजन करण्यात आले नाही. स्पर्धाच घेण्यात न आल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्याचा प्रस्ताव तयार करून ताे वरिष्ठांकडे पाठवायचा कसा, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमाेर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, क्रीडा गुण मिळत असल्याने अनेक विद्यार्थी नियमित अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाेबतच त्यांच्या आवडीच्या खेळांमध्ये इयत्ता आठवीपासून सहभागी हाेतात आणि नियमित सरावदेखील करतात. काेराेनामुळे या विद्यार्थ्यांवर क्रीडा गुण मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

...

खेळाची उज्ज्वल परंपरा

काेंढाळीला खेळ व खेळाडूंची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी मागील २५ वर्षांत या परंपरेत आणखी भर टाकली आहे. यात काेंढाळी येथील लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू अग्रणी आहेत. या शाळेतील ५० ते ६० खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धा तर, ५ ते ७ खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी हाेतात. सन २०१८-१९ मध्ये या शाळेतील ६० खेळाडूंनी विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर जिल्ह्याचे तर, सहा खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

...

संगीत, चित्रकलेचे सवलत गुण

एक ते दीड वर्षापासून कोणत्याही क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाले नाही. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणापासून वंचित राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा गुणाप्रमाणेच संगीत व चित्रकलेचेही सवलत गुण मिळतात. संगीत व चित्रकलेची परीक्षा कोणत्याही वर्षी दिली तरी त्याचे सवलत गुण मिळतात. त्यासाठी दहावी व बारावीच्या वर्षीच सहभागाची अट नसते. क्रीडा सवलत गुणासाठी ही अट आहे. त्यामुळे विद्यार्थी इयत्ता आठवीपासून विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी हाेतात. त्यांना क्रीडा गुणापासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया दुधाळा (ता. काटाेल) येथील त्रिमूर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षक राजेंद्र खामकर यांनी व्यक्त केली.