शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कसा करणार पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:08 IST

नागपूर : दहावी आणि बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...

नागपूर : दहावी आणि बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात १४ डिसेंबरपासून, तर महापालिकेच्या हद्दीतील शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. अजूनही शाळांमध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. एकीकडे परीक्षा तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. शासनाने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली असली तरी, ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यास साधारणत: साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीला शिकविणारे शिक्षक व विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या गोंधळात आहेत.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये शासनाने ऑनलाइन शिक्षणावर जोर दिला. पण ग्रामीण भागात ऑनलाइनच्या समस्या असल्याने अपेक्षित अभ्यासक्रम शिकविला गेला नाही. १४ डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यात अभ्यासाला सुरुवात झाली. यंदा ७५ टक्के अभ्यासक्रमावरच पेपर निघणार आहे. पण ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करायलाही साडेतीन महिन्यांच्यावर कालावधी लागतो आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षक केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देत आहे. मुलांची रिव्हिजन, प्रॅक्टिकल कसे घेणार हा प्रश्नच आहे. शहरामध्ये काही नामांकित शाळांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस जुलै महिन्यापासूनच सुरू केले होते. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले असून, आता ते विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करवून घेत आहे. सोबतच प्रॅक्टिकलची तयारी करीत आहेत.

- आम्ही जुलैमध्ये ऑनलाइन क्लासेस सुरू केले. डिसेंबरमध्ये आमचा अभ्यासक्रम संपला. आता आम्ही रिव्हिजन व प्रॅक्टिकलवर फोकस करीत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर वेळ मिळणार असल्याने परीक्षेचे टेन्शन नाही.

अर्चना डाखोळे, प्राचार्य, सोमलवार हायस्कूल

- ७५ टक्के संपूर्ण अभ्यासक्रम अपेक्षित वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. अभ्यासक्रम कुठून सुरू करायचा, असा प्रश्न पडतो आहे. अभ्यासक्रम कमी केला असला तरी, संपूर्ण धडे अभ्यासाचे आहे. धड्यातील एक भाग कमी केला आहे. अजूनही उपस्थिती ५० टक्क्यांवर नाही. ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही वर्ग शिकविणे शक्य नाही. विद्यार्थी गोंधळलेल्या मन:स्थितीत आहे.

- डॉ.अशोक गव्हाणकर, प्राचार्य

- महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभाग गप्पगार बसला आहे. २०२१ सत्रातील परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रात्यक्षिक याबद्दल दिशानिर्देश स्पष्ट नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा केंद्रावरील व्यवस्था व नियोजन अस्पष्ट आहे. जानेवारी महिना अर्धा लोटला तरीही संथ गतीने शिक्षण विभागाची कार्यपद्धती ही चिंता वाढविणारी बाब आहे.

प्रा. सपन नेहरोत्रा

- आमच्या शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांवर सुरुवातीपासूनच फोकस केले. ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षक सातत्याने संपर्कात होते. शाळेच्या पुढाकारामुळे आम्ही अभ्यासात खंड पडू दिला नाही. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. आता आमची रिव्हिजन सुरू आहे.

अखिलेश डांगे, शहरी विद्यार्थी

- ग्रामीण भागात ऑक्टोबर महिन्यापर्यंत शाळांनी गांभीर्याने घेतलेच नाही. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण शक्यच नव्हते. डिसेंबर महिन्यात शाळा सुरू झाली आहे. ७५ टक्के अभ्यासक्रम तीन महिन्यात शक्य नाही. आमचा केवळ अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. परीक्षेची तयारी नाही. ग्रामीण भागातील परिस्थितीचे आकलन करून किमान ५० टक्के अभ्यासक्रमावरच पेपर घ्यावेत.

नीलेश कारोकार, ग्रामीण विद्यार्थी