शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

विदर्भात पावसाचा हाहाकार; नागपूर, भंडारा, गाेंदियाला सर्वाधिक फटका, १० नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 10:48 IST

शेकडो गावांचा संपर्क तुटला, हजारो नागरिकांचे स्थलांतर

ठळक मुद्देधरणांमध्ये पाणीसाठा वाढला, विसर्ग सुरूठिकठिकाणी मार्ग बंद; वाहतूक ठप्प, अनेक घरांची पडझड

नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नागपूरसह चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गाेंदियात दाेन शेतमजुरांसह दाेन तरुण पुरात वाहून गेले, तर भंडारा जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे नाल्याच्या पुरात एकजण बुडाला. याशिवाय नागपूर शहर आणि जिल्ह्यात चार अशा एकूण १० जणांचा बळी गेला.

नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. यातच लहान- मोठी धरणे भरू लागल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे नदी- नाल्यांच्या काठावर असलेल्या तब्बल ३४८ गावांना धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी पेंच नदीवरील नवेगाव खैरी हे धरण १०० टक्के भरले आहे. धरणाचे पूर्ण १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यांतील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. रामटेक तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला. नागपूर शहरातील कळमना व नारा भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. जवळपास ५० घरांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील काही शाळांनी बुधवारी स्वत:हून सुटी जाहीर केली होती. नागपुरात दोन दिवस पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

भंडारा जिल्ह्यात सतत धो-धो बरसणाऱ्या पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली असून, गत २४ तासांत तब्बल ९५.८ मिमी पाऊस झाला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी एक मीटरने उघडले, तर मोहाडी तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. तर, वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पात्रातील नृसिंह मंदिरात १५ भाविक अडकले.

गाेंदिया जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी- नाले तुडुंब भरून वाहत असून, तिरोडा- गोंदिया मार्गावरील नाल्यावरील कच्चा पूल वाहून गेला, तर आमगाव-गोंदिया मार्गावरील सिंदीपारटोला नाल्यावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या २४ तासांत ८३.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे ७० घरांची पडझड झाली, तर दोन जनावरांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना घडली.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाला. यासोबत गोदावरी, प्राणहिता आणि वैनगंगा नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील २,१०३ लोकांना संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांना एसडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बाहेर काढले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली असून, वर्धा व पैनगंगा नदीला पूर आला आहे. राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले असून, जिल्ह्यातील ८ धरणे फुल झाली आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे पाऊण इंचाने उघडले.

वर्धेत तीन गावांमध्ये शिरले पाणी

वर्धा/अमरावती/यवतमाळ : दमदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील विश्रोळी (ता. चांदूर बाजार) येथील पूर्णा प्रकल्पाची पाच दारे सकाळी ११ वाजेपासून उघडली आहेत. मंगळवारी नांदगाव खंडेश्वर येथे लेंडी नाल्याला पूर गेला, तर मायवाडी (ता. मोर्शी) नजीक माडू नदीपात्रात अशोक लखुजी नांदने (५५, रा. असदपूर, ता. अचलपूर) यांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात पवनूर येथील वनराई बंधारा मंगळवारी वाहून गेल्याने पवनूर, खानापूर आणि कामठी या गावात घरांमध्ये पाणी शिरले होते. यवतमाळ जिल्ह्यातील शंभरपैकी ५५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरDeathमृत्यूVidarbhaविदर्भ