शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पावसाचा हाहाकार; नागपूर, भंडारा, गाेंदियाला सर्वाधिक फटका, १० नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 10:48 IST

शेकडो गावांचा संपर्क तुटला, हजारो नागरिकांचे स्थलांतर

ठळक मुद्देधरणांमध्ये पाणीसाठा वाढला, विसर्ग सुरूठिकठिकाणी मार्ग बंद; वाहतूक ठप्प, अनेक घरांची पडझड

नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नागपूरसह चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गाेंदियात दाेन शेतमजुरांसह दाेन तरुण पुरात वाहून गेले, तर भंडारा जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे नाल्याच्या पुरात एकजण बुडाला. याशिवाय नागपूर शहर आणि जिल्ह्यात चार अशा एकूण १० जणांचा बळी गेला.

नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. यातच लहान- मोठी धरणे भरू लागल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे नदी- नाल्यांच्या काठावर असलेल्या तब्बल ३४८ गावांना धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी पेंच नदीवरील नवेगाव खैरी हे धरण १०० टक्के भरले आहे. धरणाचे पूर्ण १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यांतील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. रामटेक तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला. नागपूर शहरातील कळमना व नारा भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. जवळपास ५० घरांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील काही शाळांनी बुधवारी स्वत:हून सुटी जाहीर केली होती. नागपुरात दोन दिवस पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

भंडारा जिल्ह्यात सतत धो-धो बरसणाऱ्या पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली असून, गत २४ तासांत तब्बल ९५.८ मिमी पाऊस झाला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी एक मीटरने उघडले, तर मोहाडी तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. तर, वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पात्रातील नृसिंह मंदिरात १५ भाविक अडकले.

गाेंदिया जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी- नाले तुडुंब भरून वाहत असून, तिरोडा- गोंदिया मार्गावरील नाल्यावरील कच्चा पूल वाहून गेला, तर आमगाव-गोंदिया मार्गावरील सिंदीपारटोला नाल्यावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या २४ तासांत ८३.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे ७० घरांची पडझड झाली, तर दोन जनावरांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना घडली.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाला. यासोबत गोदावरी, प्राणहिता आणि वैनगंगा नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील २,१०३ लोकांना संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांना एसडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बाहेर काढले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली असून, वर्धा व पैनगंगा नदीला पूर आला आहे. राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले असून, जिल्ह्यातील ८ धरणे फुल झाली आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे पाऊण इंचाने उघडले.

वर्धेत तीन गावांमध्ये शिरले पाणी

वर्धा/अमरावती/यवतमाळ : दमदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील विश्रोळी (ता. चांदूर बाजार) येथील पूर्णा प्रकल्पाची पाच दारे सकाळी ११ वाजेपासून उघडली आहेत. मंगळवारी नांदगाव खंडेश्वर येथे लेंडी नाल्याला पूर गेला, तर मायवाडी (ता. मोर्शी) नजीक माडू नदीपात्रात अशोक लखुजी नांदने (५५, रा. असदपूर, ता. अचलपूर) यांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात पवनूर येथील वनराई बंधारा मंगळवारी वाहून गेल्याने पवनूर, खानापूर आणि कामठी या गावात घरांमध्ये पाणी शिरले होते. यवतमाळ जिल्ह्यातील शंभरपैकी ५५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरDeathमृत्यूVidarbhaविदर्भ