शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

शुभमंगल सावधान! तेही नियम पाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST

भिवापूर : कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. प्रशासनाने गर्दी, मास्क, सॅनिटायझरच्या अमलबंजावणीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे महानगरातील लग्नसोहळे ...

भिवापूर : कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. प्रशासनाने गर्दी, मास्क, सॅनिटायझरच्या अमलबंजावणीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे महानगरातील लग्नसोहळे रद्द झाले. मात्र, लग्नकार्य थांबविणे योग्य नसल्यामुळे अनेक पालकांनी ‘शॉर्टकट’ पद्धतीने मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान करण्याचा फार्म्यूला वापरला आहे. गत वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे अनेकांचे लग्न थांबले. मुली बघण्याचे आणि दाखविण्याचे कार्यक्रमही थांबले. त्यामुळे मुला-मुलींचे पालक चिंतीत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे मुली बघण्याचा कार्यक्रम लगबगीने सुरू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भाकीत लक्षात घेत अनेकांनी लागल्या हाताने साखरपुढा उरकला. महिनाभराच्या आतच लग्न समारंभाचा बिगुल वाजविला. मात्र, तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे वधू-वर मंडळींनी लग्नासाठी केलेले मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द करावे लागले. नागपूर शहरात कोरोनाची स्थिती भायवह आहे. अशात एकत्रित येणे, गर्दी करणे आणि लग्न लावणे धोक्याची बाब आहे. त्यामुळे अनेकांनी वधू मुलीला वर मंडळीच्या मुक्कामी गावात बोलावून पाच पन्नास आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्न कार्य उरकण्याचा कार्यक्रम चालविला आहे. संसर्गजन्य परिस्थितीत तालुक्यात अनेक गावखेड्यात व शहरात लग्न कार्य पार पडले. मात्र, पाहूण्यांची संख्या कुठे पन्नाशी, तर कुठे शंभरीपार गेलेली नाही. कारण शहर स्तरावर नगरपंचायत व ग्रामपातळीवर ग्रामपंचायतची यंत्रणा गर्दीच्या ठिकाणी कार्यवाही करण्यास सज्ज आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातून कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे अनेकजण शहरातील नातेवाइकांना निमंत्रण देण्याचे टाळत असल्याचे दिसते. गर्दी दिसल्यास, तोंडावर मास्क नसल्यास थेट दंडात्मक कारवाई करा, असा पवित्रा तालुकास्तरीय यंत्रणेने घेतलेला आहे. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, खंडविकास अधिकारी माणिक हिमाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत यांच्या नेतृत्वातील टीम तालुका स्तरावर संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास प्रयत्नरथ आहे.

लग्नाची अखर्चित रक्कम भविष्यासाठी भेट

लग्नकार्यात लाखो रुपयांची उधळपट्टी होते. परिस्थिती नसतानासुद्धा पालकवर्ग उधारवाढ आणि कर्ज काढून मुलीचा विवाह करतात. मुलाकडील मंडळीसुद्धा स्वागत समारोहासाठी लाखो रुपये खर्ची घालतात. मात्र, कोरोनामुळे लग्नात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे होणाऱ्या लाखोंच्या खर्चालासुद्धा लगाम बसला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी लग्नकार्यातील अखर्चित रक्कम विवाहित मुलीच्या व जावयाच्या भविष्यासाठी एफडी किंवा लाईफ इन्शुरन्सच्या रूपाने भेट दिली आहे.