शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांपासून मुक्ती द्या

By admin | Updated: May 25, 2017 01:58 IST

शहरात निव्वळ एकच ग्वालबन्सी भूमाफिया नसून, अनेक भूमाफियांकडून आजही लोकांची फसवणूक सुरू आहे.

संविधान चौकात धरणे : शेकडो लोकांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात निव्वळ एकच ग्वालबन्सी भूमाफिया नसून, अनेक भूमाफियांकडून आजही लोकांची फसवणूक सुरू आहे. गेल्या १० वर्षात विकसित होत असलेल्या नागपूरमुळे भूमाफियांच्या टोळ्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. भूमाफियांनी गुंडगिरी करून शेकडो एकर जमिनीवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केले आहे. त्यात गरीब, निरपराध लोक भूमाफियांचे बळी पडले आहेत. कुठलीही शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पीडितांना न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे. शहरातील भूमाफियांपासून पीडित असलेल्या नागरिकांनी भूमाफिया पीडित जनआंदोलन उभारून संविधान चौकात धरणे दिले. आंदोलकांनी शासनाकडे मागणी केली आहे की, भूमाफियांवर अंकुश ठेवण्यासाठी आंध्र प्रदेशातील लॅण्डग्रेविंग कायदा १९८२ महाराष्ट्र शासनानेही लागू करावा. पीडितांतर्फे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता, पोलीस आर्थिक फसवणूक झाल्यानंतरही अदखलपात्र गुन्हा नोंदवून भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांवर काहीच कारवाई करीत नाही. पोलिसांद्वारे पीडितांना सरळ न्याय मिळावा अशी प्रशासकीय व्यवस्था करण्यात यावी. नागपूर शहर व ग्रामीणमध्ये पी.यू. लॅण्डच्या नावाने लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात येत आहे. यावर स्वतंत्रपणे निवृत्त न्यायाधीशामार्फत समितीचे गठण करून पी.यू.च्या सर्व जमिनी पुन्हा नागरिकांच्या सुविधेसाठी तत्काळ प्रशासनाने ताब्यात घेऊन दोषींवर कारवाई करावी. भूमाफिया ग्वालबन्सी प्रकरणात गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीला स्थायी स्वरूप द्यावे. आरक्षित केलेल्या परिसिमन जमिनीची माहिती नगर रचना विभागाने लिखित स्वरूपात फलकांवर प्रसिद्ध करून त्याची आराजी व त्याचा उपयोग जनतेसमोर माहितीसाठी करण्यात यावा. गेल्या सात वर्षात नागपूरमध्ये जमिनीच्या वादातून अनेकांची हत्या झालेली आहे. अनेक भूमाफिया राजकीय क्षेत्रात सर्रासपणे वावरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. भूमाफिया पीडित जनआंदोलनाचे अध्यक्ष दिलीप नरवडिया, कार्याध्यक्ष रवी गाडगे पाटील, सचिव ज्ञानेश्वर गुरव, नरेश निमजे यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुकुंद घाटे, निखिल गांधी, लजित चौरिया, अशोक देशमुख, राम माकडे, सुनील खंडेलवाल, मुन्ना महाजन, राजेश जाधव, सुभाष ढबाले, राजेश श्रीवास्तव अश्वजित पाटील, महेश मामीडवार, मनोज मालविया, भगवानदास राठी, दुर्योधन निंबर्ते, मनोज अवचट आदी उपस्थित होते.