शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

घटनात्मक अधिकारासाठी संघटित व्हा

By admin | Updated: January 26, 2015 00:56 IST

दलित, आदिवासी व मागासवर्गीयांचा अद्याप आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास झालेला नाही. घटनात्मक अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघटना पुनरुज्जीवित

हितकारिणी परिषद : सुखदेव थोरात यांचे आवाहननागपूर : दलित, आदिवासी व मागासवर्गीयांचा अद्याप आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास झालेला नाही. घटनात्मक अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघटना पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. यासाठी विविध संघटनांनी संघटित व्हावे ,असे आवाहन इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्सेस रिसर्च चे अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात यांनी रविवारी साई सभागृहात आयोजित बौद्ध -दलित-आदिवासी व इतर मागासवर्गीय हितकारिणी परिषदेत केले.अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे होते. डॉ.एम.एल.कासारे, प्रा. सुचित बागडे, डॉ. सुनील तलवारे, कृष्णा इंगळे, विद्याधर बनसोड, प्रा. धम्मसंगिनी, भीमराव वाघमारे, डॉ. विजय खरे, अल्का पाटील, विलास भोंगाडे, प्रकाश बनसोड, जे.एस.पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासोबतच आर्थिक समानता निर्माण करण्याची सरकारची जबाबदारी आहे. परंतु आज खासगीकरणाच्या नावाखाली घटनात्मक अधिकार हिरावले जात आहे. खासगी संस्थात आरक्षण, मागासवर्गीना उच्च व तंत्र शिक्षण, रोजगाराच्या संधी, भूमिहीन लोकांना जमीन मिळाली पाहिजे. उपेक्षितांना न्याय मिळावा यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत. परंतु हे प्रयत्न पुरेसे नाही. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याने हितकारिणी परिषदेची स्थापना करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी दिली.सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. कायद्याचे संरक्षण असूनही आज जातीयतेचा प्रश्न कायम आहे. उपेक्षित घटकांना घटनेत देण्यात आलेली आश्वासने पूर्ण झाली का, ती किती झाली, याचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना संविधानाच्या मूल्याची जाणीव नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. अपेक्षितांना घटनात्मक तरतुदीचा लाभ मिळावा,यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ मुद्यांचे निवेदन दिल्याची माहिती इ.झेड.खोब्रागडे यांनी दिली. अनुसूचित जाती-जमातीच्या विकासासाठी लोकसंख्येच्या आधावर निधी खर्च व्हावा, असे मत त्यांनी मांडले.आर्थिक व सामाजिक सर्वे करण्याची गरज असल्याचे एम.एल.कासारे यांनी प्रस्ताविकातून सांगितले. यावेळी सुचित बागडे, सुनील तलवारे, कृष्णा इंगळे, विद्याधर बनसोड, प्रा. धम्मसंगिनी, भीमराव वाघमारे, डॉ. विजय खरे, अल्का पाटील, विलास भोंगाडे, प्रकाश बनसोड आदींनी मार्गदर्शन केले. संचालन प्रा. मोहन वानखेडे यांनी तर आभार प्रा. विद्या चौरपगार यांनी मानले. विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)