शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

नागपुरात कचराकुंड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:16 IST

शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात अव्वल कसे येणार : कचराकुंड्यांवरील खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.प्रतापनगर भागातील गिट्टीखदान ले-आऊ ट येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेल्या काही दिवसापासून कचराकुंड्या पडून आहेत. काही कुंड्या कचरा वेचणाºयांनी तोडून भंगारवाल्यांना विकल्याची माहिती आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा यासाठी घरोघरी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन डस्टबिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय कायद्याच्या चौकटीत अडल्याने त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या कडेला कचराकुंडया लावल्या. परंतु यातील कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या. तक्रार आली तर कचरा उचलला जातो नाही तर कचराकुंड्या कचऱ्याने भरलेल्या राहतात. यामुळे ये-जा करणाऱ्यांना तसेच बाजूला राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.केंद्र शासनाच्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नागपूर शहराचा क्रमांक ५३ वरून ५५ व्या स्थानावर गेला आहे. तो तसा जाण्याला या कुंड्यांचाही थोडाफार हातभार आहे. शहरातील विविध भागात अशा १७०० कचराकुंडया लावण्यात आल्या. मात्र, गेल्या वर्षभरात त्यातील अनेक डबे तुटून पडले आहेत, तर काही चोरीला गेले. शहरातील अनेक भागात घराघरातून कचरा उचलला जात असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तविकता तशी नाही. आजही अनेकांच्या घरी कचरा उचलायला कुणीच जात नाही. प्रभागातीलच एका भागात कचरा साठवून ठेवला जातो.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न