शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

नागपुरात कचराकुंड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:16 IST

शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात अव्वल कसे येणार : कचराकुंड्यांवरील खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.प्रतापनगर भागातील गिट्टीखदान ले-आऊ ट येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेल्या काही दिवसापासून कचराकुंड्या पडून आहेत. काही कुंड्या कचरा वेचणाºयांनी तोडून भंगारवाल्यांना विकल्याची माहिती आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा यासाठी घरोघरी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन डस्टबिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय कायद्याच्या चौकटीत अडल्याने त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या कडेला कचराकुंडया लावल्या. परंतु यातील कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या. तक्रार आली तर कचरा उचलला जातो नाही तर कचराकुंड्या कचऱ्याने भरलेल्या राहतात. यामुळे ये-जा करणाऱ्यांना तसेच बाजूला राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.केंद्र शासनाच्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नागपूर शहराचा क्रमांक ५३ वरून ५५ व्या स्थानावर गेला आहे. तो तसा जाण्याला या कुंड्यांचाही थोडाफार हातभार आहे. शहरातील विविध भागात अशा १७०० कचराकुंडया लावण्यात आल्या. मात्र, गेल्या वर्षभरात त्यातील अनेक डबे तुटून पडले आहेत, तर काही चोरीला गेले. शहरातील अनेक भागात घराघरातून कचरा उचलला जात असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तविकता तशी नाही. आजही अनेकांच्या घरी कचरा उचलायला कुणीच जात नाही. प्रभागातीलच एका भागात कचरा साठवून ठेवला जातो.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न