शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

नागपुरात कचराकुंड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:16 IST

शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात अव्वल कसे येणार : कचराकुंड्यांवरील खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.प्रतापनगर भागातील गिट्टीखदान ले-आऊ ट येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेल्या काही दिवसापासून कचराकुंड्या पडून आहेत. काही कुंड्या कचरा वेचणाºयांनी तोडून भंगारवाल्यांना विकल्याची माहिती आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा यासाठी घरोघरी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन डस्टबिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय कायद्याच्या चौकटीत अडल्याने त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या कडेला कचराकुंडया लावल्या. परंतु यातील कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या. तक्रार आली तर कचरा उचलला जातो नाही तर कचराकुंड्या कचऱ्याने भरलेल्या राहतात. यामुळे ये-जा करणाऱ्यांना तसेच बाजूला राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.केंद्र शासनाच्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नागपूर शहराचा क्रमांक ५३ वरून ५५ व्या स्थानावर गेला आहे. तो तसा जाण्याला या कुंड्यांचाही थोडाफार हातभार आहे. शहरातील विविध भागात अशा १७०० कचराकुंडया लावण्यात आल्या. मात्र, गेल्या वर्षभरात त्यातील अनेक डबे तुटून पडले आहेत, तर काही चोरीला गेले. शहरातील अनेक भागात घराघरातून कचरा उचलला जात असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तविकता तशी नाही. आजही अनेकांच्या घरी कचरा उचलायला कुणीच जात नाही. प्रभागातीलच एका भागात कचरा साठवून ठेवला जातो.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न