शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

गणेशोत्सवात गोळा होते ३५० टनाच्यावर निर्माल्य : निर्माल्यातून खतनिर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:37 IST

सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनासाठी भक्तांमध्ये सकारात्मकता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी सर्वात खास सण झाला आहे. श्रीगणेशाशी संबंधित सर्वच गोष्टी भक्तांसाठी श्रद्धेचा विषय. पण गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा महत्त्वाचा विषय झाला असून भाविकांमध्येही याबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. प्रदूषण होईल अशा गोष्टी टाळण्यासाठी भाविकच पुढाकार घेत असून निर्माल्याबाबत हीच भावना दिसून येत आहे. सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.सर्वसाधारणपणे हार, फुले, बेल, शमी, दुर्वा आदींचा वापर दररोजच्या पूजेसाठी केला जातो. शिवाय भाविकगण मित्रांच्या, नातेवाईकांच्या आणि मंडळातर्फे स्थापित बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. त्या वेळी मोठ्या श्रद्धेने बाप्पाच्या चरणी वाहण्यासाठी सोबत फुले, हार, दूर्वा, नारळ, पेढे, प्रसाद आदी घेऊन जातात. त्यातील बहुतेक भक्तांना वाटण्यात जातो व शिल्लक राहिलेला भाग ज्यात, पुड्यांचे आवरण, पिशव्या, वाहिलेले आणि जुने झालेल्या फुलांचे हार, माचिस, अगरबत्तीचे खोके, नारळाच्या करवंट्या, सजावटीचे मखर आदी निर्माल्य होऊन फेकून देण्यात येते. कितीतरी घरे आणि मंडळांमधून दिवसाभरात हे निर्माल्य सतत तयार होत असते ज्याला तलावात, वाहत्या पाण्यात फेकण्याची पूर्वापार प्रथा चालत आलेली आहे. हेच निर्माल्य पुढे सडल्यामुळे पाण्यात प्रदूषण व तलावातील आॅक्सिजनची मात्रा कमी करण्यास कारणीभूत ठरते. यावर उपाय म्हणून शहरातील निर्माल्य संकलित करून जैविक व अजैविक असे वर्गीकरण करून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प महापालिकेने सुरू केला आहे. मात्र गेल्या काही वर्षात मनपा व सामाजिक संस्थांद्वारे होणाऱ्या जनजागृतीमुळे निर्माल्य प्रदूषणाचा विषय लोकांना पटायला लागला आहे. त्यामुळे आता ते तलावात फेकून देण्याऐवजी मनपातर्फे ठेवलेल्या कलशामध्ये जमा करणे भक्तांना अधिक महत्त्वाचे वाटते.फुटाळा तलावातून ३५ टन निर्माल्यदरवर्षी शहरातील पाच सहा तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था असायची. मात्र यावर्षी महापालिकेने सक्करदरा, गांधीसागर, सोनेगाव, नाईक तलाव या तलावांमध्ये विसर्जन करण्यावर प्रतिबंध घातला असून आता मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी आता केवळ फुटाळा तलावातच परवानगी देण्यात आली आहे. येथे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात होते. या ठिकाणी पालिकेने दोन निर्माल्य कलश ठेवले आहेत. धरमपेठ झोनचे अधिकारी टेंभेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे १२०० च्या जवळपास मंडळाचे गणपती तर सव्वा लाखाच्यावर घरगुती गणपती विसर्जित केले जातात. विसर्जनासाठी येथे कृत्रिम टॅँकचीही व्यवस्था केली आहे. यातून दररोज दोन ते तीन टन निर्माल्य जमा होते. विसर्जनाच्या शेवटच्या दोन दिवसात ५ ते ६ टन निर्माल्य गोळा होते. अशाप्रकारे या तलावातून दहा दिवसात ३५ टनाच्यावर निर्माल्य गोळा केले जाते.शहरात ३०० ठिकाणी निर्माल्य कलशनागपूर शहरात विविध चौकामध्ये विसर्जनासाठी महापालिकेद्वारे ३०० कृत्रिम टॅँक लावण्यात येत आहेत. सध्या २०० टॅँक लावण्यात आले असून शेवटपर्यंत उर्वरित १०० लावण्यात येणार आहेत. या प्रत्येक टॅँकजवळ ५०० लिटर क्षमता असलेले ३०० निर्माल्य कलश लावले जात आहेत. या प्रत्येक कलाशातून दररोज १०० ते १५० किलो निर्माल्य गोळा होत असल्याची माहिती टेंभेकर यांनी दिली. शेवटच्या दिवशीपर्यंत जवळपास ३०० टन निर्माल्य गोळा होण्याची माहिती त्यांनी दिली.६० ते ६५ टन जैविक खत निर्मितीमहापालिकेने भांडेवाडी येथे जैविक खत निर्मितीचा प्रकल्प चालविला आहे. गणेशोत्सवाच्या काळात ३५० टनाच्या जवळपास निर्माल्य गोळा होणार असून ते महापालिकेद्वारे भांडेवाडीत पोहचविले जाणार आहे. त्यातून जैविक आणि अजैविक निर्माल्याचे विलगीकरण करून हार, फुले, दुर्वा, फळांचे सालटे आदी जैविक निर्माल्यापासून ६० ते ६५ टन जैविक खत तयार होण्याची शक्यता आहे. हे खत शहरातील उद्यानांमध्ये उपयोगात आणले जात असल्याचे टेंभेकर यांनी सांगितले.निर्माल्य तलावात पडल्यानंतर ते सडल्यामुळे अनएरोबिक स्थिती निर्माण होते व पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. तलावात प्रतिलिटर ६ मिलिग्रॅम ऑक्सिजनचे प्रमाण आवश्यक आहे. मात्र ते ४ ते ४.५ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत असते. विसर्जनाच्या काळात ते २.५ मिलिग्रॅम/लिटरवर येते. त्याखाली गेले तर तलावातील इकोसिस्टीम नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हे निर्माल्य तलावात जाता कामा नये. लोकांमध्ये याबाबत सकारात्मक जागृती दिसून येत आहे. कौस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजील

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर