शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात गोळा होते ३५० टनाच्यावर निर्माल्य : निर्माल्यातून खतनिर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:37 IST

सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनासाठी भक्तांमध्ये सकारात्मकता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी सर्वात खास सण झाला आहे. श्रीगणेशाशी संबंधित सर्वच गोष्टी भक्तांसाठी श्रद्धेचा विषय. पण गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा महत्त्वाचा विषय झाला असून भाविकांमध्येही याबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. प्रदूषण होईल अशा गोष्टी टाळण्यासाठी भाविकच पुढाकार घेत असून निर्माल्याबाबत हीच भावना दिसून येत आहे. सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.सर्वसाधारणपणे हार, फुले, बेल, शमी, दुर्वा आदींचा वापर दररोजच्या पूजेसाठी केला जातो. शिवाय भाविकगण मित्रांच्या, नातेवाईकांच्या आणि मंडळातर्फे स्थापित बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. त्या वेळी मोठ्या श्रद्धेने बाप्पाच्या चरणी वाहण्यासाठी सोबत फुले, हार, दूर्वा, नारळ, पेढे, प्रसाद आदी घेऊन जातात. त्यातील बहुतेक भक्तांना वाटण्यात जातो व शिल्लक राहिलेला भाग ज्यात, पुड्यांचे आवरण, पिशव्या, वाहिलेले आणि जुने झालेल्या फुलांचे हार, माचिस, अगरबत्तीचे खोके, नारळाच्या करवंट्या, सजावटीचे मखर आदी निर्माल्य होऊन फेकून देण्यात येते. कितीतरी घरे आणि मंडळांमधून दिवसाभरात हे निर्माल्य सतत तयार होत असते ज्याला तलावात, वाहत्या पाण्यात फेकण्याची पूर्वापार प्रथा चालत आलेली आहे. हेच निर्माल्य पुढे सडल्यामुळे पाण्यात प्रदूषण व तलावातील आॅक्सिजनची मात्रा कमी करण्यास कारणीभूत ठरते. यावर उपाय म्हणून शहरातील निर्माल्य संकलित करून जैविक व अजैविक असे वर्गीकरण करून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प महापालिकेने सुरू केला आहे. मात्र गेल्या काही वर्षात मनपा व सामाजिक संस्थांद्वारे होणाऱ्या जनजागृतीमुळे निर्माल्य प्रदूषणाचा विषय लोकांना पटायला लागला आहे. त्यामुळे आता ते तलावात फेकून देण्याऐवजी मनपातर्फे ठेवलेल्या कलशामध्ये जमा करणे भक्तांना अधिक महत्त्वाचे वाटते.फुटाळा तलावातून ३५ टन निर्माल्यदरवर्षी शहरातील पाच सहा तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था असायची. मात्र यावर्षी महापालिकेने सक्करदरा, गांधीसागर, सोनेगाव, नाईक तलाव या तलावांमध्ये विसर्जन करण्यावर प्रतिबंध घातला असून आता मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी आता केवळ फुटाळा तलावातच परवानगी देण्यात आली आहे. येथे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात होते. या ठिकाणी पालिकेने दोन निर्माल्य कलश ठेवले आहेत. धरमपेठ झोनचे अधिकारी टेंभेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे १२०० च्या जवळपास मंडळाचे गणपती तर सव्वा लाखाच्यावर घरगुती गणपती विसर्जित केले जातात. विसर्जनासाठी येथे कृत्रिम टॅँकचीही व्यवस्था केली आहे. यातून दररोज दोन ते तीन टन निर्माल्य जमा होते. विसर्जनाच्या शेवटच्या दोन दिवसात ५ ते ६ टन निर्माल्य गोळा होते. अशाप्रकारे या तलावातून दहा दिवसात ३५ टनाच्यावर निर्माल्य गोळा केले जाते.शहरात ३०० ठिकाणी निर्माल्य कलशनागपूर शहरात विविध चौकामध्ये विसर्जनासाठी महापालिकेद्वारे ३०० कृत्रिम टॅँक लावण्यात येत आहेत. सध्या २०० टॅँक लावण्यात आले असून शेवटपर्यंत उर्वरित १०० लावण्यात येणार आहेत. या प्रत्येक टॅँकजवळ ५०० लिटर क्षमता असलेले ३०० निर्माल्य कलश लावले जात आहेत. या प्रत्येक कलाशातून दररोज १०० ते १५० किलो निर्माल्य गोळा होत असल्याची माहिती टेंभेकर यांनी दिली. शेवटच्या दिवशीपर्यंत जवळपास ३०० टन निर्माल्य गोळा होण्याची माहिती त्यांनी दिली.६० ते ६५ टन जैविक खत निर्मितीमहापालिकेने भांडेवाडी येथे जैविक खत निर्मितीचा प्रकल्प चालविला आहे. गणेशोत्सवाच्या काळात ३५० टनाच्या जवळपास निर्माल्य गोळा होणार असून ते महापालिकेद्वारे भांडेवाडीत पोहचविले जाणार आहे. त्यातून जैविक आणि अजैविक निर्माल्याचे विलगीकरण करून हार, फुले, दुर्वा, फळांचे सालटे आदी जैविक निर्माल्यापासून ६० ते ६५ टन जैविक खत तयार होण्याची शक्यता आहे. हे खत शहरातील उद्यानांमध्ये उपयोगात आणले जात असल्याचे टेंभेकर यांनी सांगितले.निर्माल्य तलावात पडल्यानंतर ते सडल्यामुळे अनएरोबिक स्थिती निर्माण होते व पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. तलावात प्रतिलिटर ६ मिलिग्रॅम ऑक्सिजनचे प्रमाण आवश्यक आहे. मात्र ते ४ ते ४.५ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत असते. विसर्जनाच्या काळात ते २.५ मिलिग्रॅम/लिटरवर येते. त्याखाली गेले तर तलावातील इकोसिस्टीम नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हे निर्माल्य तलावात जाता कामा नये. लोकांमध्ये याबाबत सकारात्मक जागृती दिसून येत आहे. कौस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजील

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर