गांबिया ते नागपूर : भारतीय निकृष्ट औषधांचा मृत्यूचा साखळी प्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:11 IST2025-10-27T15:11:08+5:302025-10-27T15:11:56+5:30

Nagpur : भारताची औषधनिर्मितीत केवळ 'खिशाला परवडणारी औषधे' पुरविणारा देश म्हणून प्रतिमा आहे. ती बदलून 'गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा करणारा एकमेव देश' अशी प्रतिमा होणे अपेक्षित आहे. केवळ त्या प्रतिमेवरच पुढे भारतीय उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व टिकून राहील.

Gambia to Nagpur: A deadly chain experiment of substandard Indian drugs! | गांबिया ते नागपूर : भारतीय निकृष्ट औषधांचा मृत्यूचा साखळी प्रयोग!

Gambia to Nagpur: A deadly chain experiment of substandard Indian drugs!

नागपूर : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अलीकडेच विषारी कफ सिरपमुळे २६ मुलांचा मृत्यू झाला. 'सेसन फार्मास्युटिकल्स'ने बनवलेल्या कोल्ड्रिफ सिरपमध्ये ४८.६% डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) हे रसायन असल्याचे चाचणीत आढळले. इतक्या प्रमाणात सेवन केल्यावर ते विष होते. तामिळनाडू येथील 'सेसन'ने सुरक्षाविषयक गंभीर उल्लंघने उघडकीस आली. औषधनिर्मितीसाठी वापरण्या योग्य नसलेली नॉन-फार्माग्रेड रसायने, गंजलेली उपकरणे तेथे आढळली. 

२०१९-२० मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये निकृष्ट दर्जाच्या कफ सिरपमुळे ११ मुलांचा मृत्यू झाला होता. हे सिरप हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मेघालय, त्रिपुरा येथेही विकले गेले होते. २०२२ मध्ये डीईजी दूषित भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्याने गांबियामध्ये ७० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. तसेच उझबेकिस्तानमध्ये १८ मुले दगावली होती.

२०२४ मध्ये कर्नाटकातील बेल्लारी जिल्हा रुग्णालयात ३४ महिलांची सिझेरिअन प्रसूती झाली. त्यापैकी सात महिलांना मूत्रपिंड दुखापत, अवयव निकामी होणे अशा गुंतागुंत होऊन ५ महिलांचा मृत्यू झाला.

भारतीय औषध गुणवत्ता नियमनातील उणिवा

२००३ मध्ये शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर समितीने भारतातील औषध नियमन व्यवस्थेचा अभ्यास करून भारत सरकारला एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी काही त्रुटी ताबडतोब दूर करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

भारतातील जवळपास अर्ध्या राज्य औषध चाचणी प्रयोगशाळांमध्ये योग्य उपकरणे किंवा पात्र विश्लेषकांचा अभाव आहे.
अमेरिकेत ४८ राज्ये आणि प्यूर्टो रिकोमध्ये सुमारे २,५०० औषध उत्पादक आणि १,५८० बायोफार्मास्युटिकल उत्पादन सुविधा आहेत. यावर देखरेख करण्यासाठी, एफडीएतर्फे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शास्त्रज्ञ, निरीक्षक आणि प्रशासकांसह १८,००० हून अधिक लोक कार्यरत आहेत. त्या तुलनेत, भारतात ३,००० हून अधिक औषध कंपन्यांमध्ये सुमारे १०,५०० औषध उत्पादन युनिट्स आहेत. ही संख्या अमेरिकेपेक्षा सुमारे चार पट अधिक आहे. तरीही भारतातील नियामक कर्मचारीवर्ग अत्यंत कमी आहे.

भारतात औषध उत्पादनासाठी परवाने राज्य सरकारकडून दिले जातात, तर केंद्र सरकार मानके ठरवते आणि निर्यात हाताळते. यामुळे अंमलबजावणीत विसंगती निर्माण झाली आणि नियमन प्रणाली गुंतागुंतीची आणि अपारदर्शक झाली आहे.

गंभीर दुखापत किंवा मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या बनावट औषधांच्या विक्री आणि उत्पादनासाठी कडक दंडात्मक कारवाईची तरतूद आवश्यक आहे. सध्याच्या कायद्यात तशी कठोर तरतूद नाही. नकली औषधे बनविणाऱ्या उत्पादकांवर जरब बसेल यासाठी यात आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे.

भारताचा औषध उद्योग; ना हमी, ना गुणवत्ता 

  • १०,५०० औषध उत्पादन युनिट्स भारतात आहेत.
  • ३,००० कंपन्या औषधनिर्मिती करतात. त्यापैकी...
  • १,४०० युनिट्सना डब्ल्यूएचओ-जीएमपी मान्यताप्राप्त (विकसनशील देशांमध्ये निर्यात करतात.)
  • २६० याप्सनाकाजी मान्यताप्राप्त (विकसित देशांमध्ये निर्यात करतात.)
  • २५३ युरोपियन हत्यारेक्टरेट मेडिसिन मान्यताप्राप्त. (युरोपियन देशांमध्ये निर्यात करतात.)
  • उरलेले हजारो उत्पादक केवळ 'घरगुती वापराचे' औषध तयार करतात.

 

या सर्व घटना मुख्यत्वे कुठे घडल्या? तर भारतामध्ये आणि औषधाबद्दल अजिबातच कायदा सुरक्षितता नसलेल्या किंवा कमी प्रमाणात असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये त्या घडल्या नाहीत. कारण त्या देशांमध्ये औषधांच्या गुणवत्तेचे नियमन अतिशय कडक आहे. आपल्याकडे मात्र तसे नाही.

Web Title : भारत में बनी दवाओं से मौतें: गांबिया से नागपुर, त्रासदी की श्रृंखला!

Web Summary : घटिया भारतीय दवाओं के कारण गांबिया, उज्बेकिस्तान और भारत में मौतें हुईं। दोषपूर्ण नियम, अपर्याप्त परीक्षण प्रयोगशालाएँ और कमजोर दंड असुरक्षित दवाओं के उत्पादन को सक्षम करते हैं। एक समिति की रिपोर्ट में गंभीर कमियों पर प्रकाश डाला गया है जिन्हें तत्काल सुधार की आवश्यकता है। सख्त प्रवर्तन आवश्यक है।

Web Title : India-Made Drug Deaths: Gambia to Nagpur, a Chain of Tragedy!

Web Summary : Substandard Indian drugs caused deaths in Gambia, Uzbekistan, and India. Faulty regulations, inadequate testing labs, and weak penalties enable production of unsafe medicines. A committee report highlighted critical flaws needing urgent correction to prevent further tragedies. Stricter enforcement is essential.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.