शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एंडिंग विसरा, कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:08 IST

नागपूर : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासन ३१ मार्चपूर्वी सर्व योजना मार्गी लावण्याच्या प्रयत्नात ...

नागपूर : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासन ३१ मार्चपूर्वी सर्व योजना मार्गी लावण्याच्या प्रयत्नात होती. बजेटसाठी उत्पन्न आणि खर्चाची गोळाबेरीज सुरू करणे सुरू होते. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आणि त्यातच निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हा परिषदेची झोपच उडाली. निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे ३१ मार्चची वाट बघू नका. प्रत्येक दिवस आपल्यासाठी डेडलाइन असल्याने पटापट कामे हातावेगळी करा, असे अधिकाऱ्यांकडून बजावण्यात आले आहे. निवडणुका कधीही लागू शकतात, या भीतीने जिल्हा परिषद प्रशासन अलर्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. आयोगाने लवकरच निवडणुकीचा स्वतंत्र कार्यक्रम घोषित करू, असेही स्पष्ट केले. तिकडे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करून १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या ४ मार्चच्या निर्णयात दुरुस्ती करावी, यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. न्यायालय त्यांची याचिका मान्य करते का? हाही प्रश्न आहे; पण आयोगाने निवडणूक घेण्यासंदर्भात स्पष्ट केल्याने निवडणुका कधीही लागू शकतात, अशी भीती प्रशासनाला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या योजना प्रलंबित आहेत. समाजकल्याण, महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, आरोग्य या विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना छोट्या- मोठ्या कारणांनी प्रलंबित आहेत. त्यातच जिल्हा परिषदेचे बजेट डोक्यावर आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची सभा पार पडली; पण बजेटच्या संदर्भात त्यात कुठलीही चर्चा झाली नाही. १६, १७ मार्च रोजी बजेट सादर होणार आहे. विभागांच्या जमा खर्चाचा ताळमेळ अजून बसलेला नाही. छोट्या- मोठ्या कारणांनी योजनांची कामे रखडत चालली आहे. प्रशासनाला ही सर्व कामे ३१ मार्चपूर्वी मार्गी लावावी लागत असल्याने मार्च महिना प्रशासनासाठी व्यस्ततेचाच असतो; पण यंदा आयोगाने निवडणुकीचा अलर्ट दिल्याने कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी सर्व विभागांना अलर्ट केले असून, आपल्यासाठी प्रत्येक दिवस ही डेडलाइन असल्याचे सांगून कामे हातावेगळी करा, असे बजावले आहे.

- अर्थसंकल्पासाठी घाई

दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र, आता लगेच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास व आचारसंहिता लागू झाल्यास जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात काही अडचणी येतील का, अशी भीती पदाधिकारी व अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या हालचालींमध्ये गती दिसू लागली आहे.