शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या बाजार विभागात गाळे वाटपात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती मागील दोन-तीन वर्षांपासून बिकट आहे. तिजोरीत पैसा नसल्याने विकास कामांना ब्रेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती मागील दोन-तीन वर्षांपासून बिकट आहे. तिजोरीत पैसा नसल्याने विकास कामांना ब्रेक लागले आहे. निधीवरून पदाधिकारी व अधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. दुसरीकडे मनपा उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रशासनही गंभीर नसल्याचे दिसत नाही. सक्करदरा येथील राष्ट्रीय गांधी मार्केटमधील गाळे वाटपात घोळ आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील ३१ दुकाने व १६ ओटे वाटपाविना पडून आहेत. अशीच परिस्थिती शहरातील अन्य बाजारांतील गाळ्यांची आहे. अशा परिस्थितीत मनपाचे उत्पन्न कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सक्करदरा मार्केट येथे मनपाने गाळे बांधले आहे. यातून मनपा तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकतो. मात्र, गाळे वाटपात घोळ आहे. मनपा प्रशासन व बाजार विभागाने गाळे वाटपाचे नियम बनविताना गाळेधारकाचे ओळखपत्र घेण्याची नियमात तरतूद नाही. यामुळे अनेकांनी बोगस रजिस्ट्री करून गाळे बळकावले आहेत. लीज नूतनीकरणातही अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात १८ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सभागृहात नगरसेवक सतीश होले यांनी प्रश्न मांडला होता. मात्र, सभा ऑनलाइन होत असल्याने हा मुद्दा चर्चेलाच आला नाही. प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात गाळे वाटपासाठी ओेळखपत्राची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सक्करदरा बाजारातील काही गाळे मनपातील एका पदाधिकाऱ्याने दुसऱ्याच्या नावावर घेऊन भाड्याने दिल्याची माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अधिकारी व पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ऑनलाइन सभेच्या नावाखाली महत्त्वाच्या विषयावरील चर्चा टाळली जात असल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे.

...

कसे वाढणार बाजार विभागाचे उत्पन्न?

बाजार विभागाचे उत्पन्न गेल्या वर्षी ५ मार्चपर्यंत ९.५९ कोटी होते. यावर्षी याच कालावधीत ७.११ कोटी जमा झाले. बाजार विभाग २.४८ कोटींनी मागे आहे. मनपाच्या जागेवर शहरात विविध भागात बाजार आहेत. सक्करदरा, इतवारी, सदर भागातील बाजारांतील गाळे व ओट्यांपासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. मात्र, मोक्याच्या जागांवरील गाळे व ओटे नाममात्र भाड्याने दिले आहेत. गाळे वाटपाही गोंधळ आहे. वर्षानुवर्षे भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही..

...

प्रशासन हतबल

मनपाची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेता उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पदाधिकारी व प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे; परंतु मनपात सोयीचे निर्णय घेतले जातात. मनपाच्या खाली जागा, इमारती, बाजारातील गाळे, बंद शाळा यातून उत्पन्न मिळू शकते; परंतु पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध लक्षात घेता प्रशासनही हतबल दिसत आहे.