शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पोलिसांनी दबाव झुगारून निष्पक्षपणे काम करावं, उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 20:41 IST

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिसांच्या कामाची प्रशंसा करतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्याही दिल्या.

नागपूर- एखाद्या विशिष्ट व्यक्तीने सांगितले म्हणून त्याच्या मनाप्रमाणे पोलिसांनी काम करू नये. सोबतच हा आपला, तो त्यांचा, असा भेद करून कुणावर अन्याय अथवा कुणाला फायदा पोहचविण्याचाही पोलिसांनी प्रयत्न करू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे पोलिसांना दिला. सुमारे १०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा पोलीस भवनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक विवेक फनसाळकर, अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर रेंज) छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (गोंदिया-गडचिरोली) संदीप पाटील, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर उपस्थित होते. 

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिसांच्या कामाची प्रशंसा करतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्याही दिल्या. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांच्या कनिष्ठांसोबत चांगले वर्तन नसते. ही बाब चांगली नाही, असे ते म्हणाले. जोपर्यंत जनतेच्या मनात असते आम्ही खुर्चीवर असतो. त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणांचीही एक विशिष्ट मुदत असते. आपणही कधी कुणाचे ज्युनिअर होतो, याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने नेहमी भान ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत. त्यामुळे ‘हा आपला तो त्यांचा’ असा दुजाभाव करू नये. चांगले काम करून पोलीस आपली चांगली प्रतिमा निर्माण करू शकतात, असे पवार म्हणाले.

यावेळी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, अलिकडे निरर्थक गोष्टींचा इश्यू करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. मालेगाव, अमरावतीत झालेल्या घटनांचा ओझरता उल्लेख करत, काही जण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची बोंब उठवतात, असे ते म्हणाले. बेरोजगारीच्या समस्येपेक्षा ‘त्यांना’ भोंग्याचा प्रश्न अधिक महत्वाचा वाटतो, असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढला. नागरिकांच्या समस्येचे निराकरण करून त्यांना आपलेपणाची वागणूक देण्याचा हितोपदेश गृहमंत्री वळसे पाटलांनी पोलिसांना दिला.

नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रीत केल्याबद्दल शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीचे काैतूक केले. नागपुरातील गुन्हेगार आजुबाजुच्या गावांत पळून जातात, त्यामुळे ग्रामीण पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली असल्याचेही ते म्हणाले. व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त करून त्यांनी कोणत्याही आरोपीची गय करू नये, असे ठणकावून सरकारचे याबाबतचे ‘झिरो टॉरलन्स’चे धोरण असल्याचे स्पष्ट केले. 

तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. राऊत यांनी शहर पोलिसांच्या कार्याचा आढावा घेत पोलिसांचे काैतूक केले. तर, क्रीडा मंत्री केदार यांनी मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष वेधले. प्रारंभी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील गुन्हेगारी आणि पोलिसांच्या भूमीकेचा आढावा घेतला. या देखण्या वास्तूच्या उभारणीसाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यापूर्वीचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे आभार मानले. 

यापुढे पोलिसांना सरकारतर्फे कर्ज... -जिर्न झालेल्या राज्यातील ८७ पोलीस ठाण्याच्या नवीन वास्तू आणि निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. यापुढे पोलिसांना सरकारतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्याचाही निर्णय गुरुवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

५२०० झाले, आता आणखी ७ हजार पोलीस -५२०० पोलिसांची भरती प्रक्रिया झाली आता नव्याने ७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, पोलीस दलाचे मणूष्यबळ वाढवण्याला सरकारचे प्राधान्य.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnagpurनागपूरPoliceपोलिस