शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

दुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 9:00 PM

भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपून गेली आहेत. राज्यात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे. अशातच सरकारने केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा फसवी आहे. महाराष्ट्रात येऊन पाहणी करून गेलेल्या केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यानंतरच दुष्काळ जाहीर करण्याची घोषणाही संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.सरकार जोपर्यंत दुष्काळ जाहीर करीत नाही तोपर्यंत खरीपातील सोयाबीन व कापसाला मदत मिळू शकत नाही. तसेच संपूर्ण राज्यात विहिरीत पाणी कमी असल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, या पिकांनाही मदत होऊ शकणार नाही. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित सवलती द्याव्यात व आर्थिक मदत करावी; अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखdroughtदुष्काळ