शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

निपाह मेंदूज्वरामुळे मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:50 IST

रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश्नन यांनी सांगितले, १७ मे रोजी २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. यावरून या रोगाची भीषणता दिसून येते.

ठळक मुद्देराष्ट्रीय ‘ब्रेन वीक’ : केरळमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश्नन यांनी सांगितले, १७ मे रोजी २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. यावरून या रोगाची भीषणता दिसून येते. 


निपाह मेंदूज्वराचे पहिल्यांदा रुग्ण १९९८ मध्ये क्वालालम्पूरजवळील निपाह या गावी दिसून आले. लवकरच तो इतर गावात आणि सिंगापूरलादेखील पसरला. येथे आणि डुकरांना हा रोग झाला आणि नंतर तो डुकराची पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. त्यावेळी २६५ रुग्णांची नोंद झाली. त्यातल १०४ रुग्ण दगावले. २००१ मध्ये सिलिगुडी येथे ६६ रुग्णांची नोंद झाली होती.
फळ खाणाऱ्या वटवाघुळांमध्ये हे विषाणू घर करून राहतात आणि नंतर जनावराच्या किंवा मनुष्याच्या शरीरात जातात आणि रोग पसरतो. वटवाघुळाला मात्र हा रोग होत नाही. मात्र त्याची लाळ आणि विष्टेमुळे फळ बाधित होतात आणि ही फळं माणसाने किंवा जनावरांनी खाल्ली तर त्यांना निपाहची लागण होते. हा रोग अतिशय लागट आहे. यामुळे विषाणुबाधित ताडी प्याल्यामुळेसुद्धा माणसामध्ये संसर्ग होतो. हा विषाणू माणसापासूनसुद्धा पसरतो. सिलिगुडी आणि बांगला देशमध्ये ६५ टक्के रुग्ण हे दवाखान्यातील कर्मचारी किंवा सुरुवातीच्या रुग्णाचे नातेवाईक होते.
 सात दिवसांत मृत्यूमुखी पडतात रुग्ण 

या भयंकर रोगाकरिता औषध नाही आणि प्रतिबंधक लसदेखील नाही. रोग कमी प्रमाणात दिसतो. परंतु घातक आहे. कारण, लक्षणे दिसताच सात दिवसांत या रोगाने रुग्ण दगावतो. औषधी नसल्यामुळे या रोगापासून बचाव करण्याची गरज आहे, असे जागतिक टॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूdoctorडॉक्टर