शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

कूचबिहार हिंसेवरून राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कूचबिहारमधील गोळीबार हा नरसंहारच असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यात नेत्यांच्या प्रवेशावर बंदी टाकली आहे. प्रवेश नाकारून आयोग तथ्य दाबत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी लावला. तर ममता यांच्या इशाऱ््यावरूनच स्थानिकांनी सुरक्षादलांवर हल्ला केला असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

शनिवारी स्थानिक लोकांनी हल्ला केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने गोळीबार केला व त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. स्थानिक लोक जवानांच्या बंदुका हिसकवण्याचा प्रयत्न करत होते, असे म्हटले जात आहे. यावर ममता यांनी भाष्य केले. सीतलकूची येथे केंद्रीय सुरक्षारक्षकांनी मतदानादरम्यान लोकांवर जाणूनबुजून गोळीबार केला. मी १४ एप्रिल रोजी तेथे जाऊ इच्छिते. देशात अयोग्य केंद्र सरकार व अयोग्य गृहमंत्री आहेत. सीआयएसएफला स्थितीचा सामना करता येत नाही. केंद्रीय दलांमधील एक वर्ग लोकांवर अत्याचार करत आहे. पहिल्या टप्प्यापासून मी हा दावा करत आहे. मात्र कुणीही माझ्याकडे लक्ष दिलेले नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूलचे कार्यकर्ते या घटनेविरोधात राज्यभरात आंदोलन करतील. निवडणूक आयोगाने एमसीसी म्हणजेच आदर्श आचार संहितेचे नाव बदलून मोदी आचारसंहिता करावे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

ममता मृत्यूचे राजकारण करत आहेत - शहा

शांतीपूर येथे एका रोड शो दरम्यान अमित शहा यांनी ममतांवर टीकास्त्र सोडले. ममतांच्या सल्ल्यावरून सीतलकूची येथे सुरक्षा दलांवर स्थानिकांनी हल्ला केला. मृत्यूचे ममता आता राजकारण करत आहेत. ममता याच त्या मृत्यूंसाठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.