शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

अतिउजव्या विचारधारेमुळे राज्यघटना धोक्यात : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 9:18 AM

न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग त्यांनी सरकारपुढे नमते घेतलेले आहे. कुठली स्वप्ने पाहावी, याचादेखील अधिकार माणसाला राहिलेला नाही, अशी टीका पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे केली.

ठळक मुद्दे बँक कर्मचाऱ्यांचे अधिवेशन

ऑनलाईन लोकमतनागपूर : अतिउजव्या विचारधारेमुळे राज्यघटना धोक्यात आली आहे. वर्तमान केंद्र सरकारने सध्या राज्यघटनेशी खेळ चालविला आहे. न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग त्यांनी सरकारपुढे नमते घेतलेले आहे. कुठली स्वप्ने पाहावी, याचादेखील अधिकार माणसाला राहिलेला नाही, अशी टीका पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे केली.

अखिल भारतीय बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी फेडरेशनचे आठवे द्विवार्षिक अधिवेशन १७ आणि १८ ऑगस्टला खामला व्यंकटेशनगर येथील अर्जुना सेलिब्रेशनमध्ये सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम, बीओएमओएचे सरचिटणीस राजीव ताम्हणे, एआयबीओएमईएफचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर, रिसेप्शन समितीचे चेअरमन बीएनजे शर्मा, महासचिव स्वयंप्रकाश तिवारी उपस्थित होते. अधिवेशन स्थळाला ए.बी. बर्धन यांचे नाव देण्यात आले आहे.

गणेश देवी म्हणाले, देशातील घटनात्मक संस्था सरकारला शरण गेल्या आहेत. घटनेतील ३७० सारखे महत्त्वपूर्ण कलम सरकारने चुटकीसरशी रद्द केले आहे. माणसाच्या आयुष्यात स्वप्नांना महत्त्वाचे स्थान आहे. पण, गेल्या काही वर्षांत स्वप्ने दाखवली आणि विकली जात आहे. सरकार दाखवेल त्या स्वप्नांचा स्वीकार करणे बंधनकारक होऊ लागले आहे. आपल्या विचारधारांनी भारतच नव्हे संपूर्ण विश्व पोखरून काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.बँक राष्ट्रीयीकरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अधिवेशन भरविण्यात आले आहे. अधिवेशनात बँकिंग उद्योगाशी निगडित वाढते कर्ज आणि त्याविरोधात एआयबीईएने उघडलेल्या मोहिमेवर चर्चा करण्यात येणार आहे. नोकरभरती, वेतनवाढ, तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचा नियमित कर्मचारी म्हणून समावेश, या प्रश्नांवर ठराव पारित करण्यासह संघटनात्मक कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. अधिवेशनात १० संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक