शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
8
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
9
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
10
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
11
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
12
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
13
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
15
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
16
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
17
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
18
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
19
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
20
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
Daily Top 2Weekly Top 5

गृहविभागावर काँग्रेसजन नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असताना केंद्र सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला बळ देण्याऐवजी गुन्हे ...

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असताना केंद्र सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला बळ देण्याऐवजी गुन्हे दाखल केले जातात, यावर युवक काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन असले तर पोलीस बघ्याच्या भूमिकेत असतात व युवक काँग्रेसचे आंदोलन असले की आक्रमक भूमिका घेतात. गृहविभाग भेदभाव करीत असून काँग्रेस कार्यकर्त्यांना दाबण्याचे काम करीत आहे, अशी थेट तक्रार अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव नगरसेवक बंटी शेळ‌के यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी बिल विरोधात युवक काँग्रेसतर्फे १२ जानेवारी रोजी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या स्मृतिमंदिरसमोर थाली बजाओ आंदोलन करण्यात आले होते. अचानकपणे केलेल्या या आंदोलनामुळे सुरक्षा एजन्सीची धावपळ उडाली. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत आंदोलनाचे नेतृत्व करणारे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १९ आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

या अटकेमुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दुखावले आहेत. १६ जानेवारी रोजी राजभवनाला घेराव घालण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू आहे. यासाठी गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक होती. तीत बंटी शेळके युवक काँग्रेसची टीम घेऊन पोहचले व पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांबद्दल अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आशीष दुआ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी प्रत्येक आंदोलनात युवक काँग्रेसचा सक्रिय सहभाग असतो. असे असतानाही जेव्हा पक्षासाठी एखादे आंदोलन केले जाते तेव्हा आपल्यावर गुन्हे दाखल होतात. भाजपची सत्ता असतानाही असे गुन्हे दाखल केले जात नव्हते. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असताना काँग्रेस नेते मध्यस्थी का करीत नाही, असा थेट सवाल शेळके यांनी दुआ यांच्याकडे केला. अशा कठिण प्रसंगी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून आवश्यक पाठबळ मिळत नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

...तर गृहमंत्र्यांशी चर्चा करू

काँग्रेस पक्ष युवा कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. शेळके यांच्यासह युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक होताच पालकमंत्र्यांनी पुढाकर घेऊन त्यांना सोडविले. यापुढे गरज भासली तर काँग्रेसचे मंत्री गृहमंत्र्यांशी चर्चा करतील.

- आशीष दुआ

सचिव, अ.भा. काँग्रेस समिती