शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची संकल्पना सुस्पष्ट व्हावी

By admin | Updated: July 6, 2014 00:51 IST

विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, विकासाच्या प्रक्रियेत ज्यांचा विकास व्हायला हवा होता त्यांचा झाला नाही. विकासाच्या प्रकल्पांमुळे अनेक जण रस्त्यावर येऊन भूमिहीन, बेरोजगार झाले.

मान्यवरांचे मत : ‘विकास : नेमका कोणाचा, कसा व किती?’ यावर चर्चासत्रनागपूर : विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, विकासाच्या प्रक्रियेत ज्यांचा विकास व्हायला हवा होता त्यांचा झाला नाही. विकासाच्या प्रकल्पांमुळे अनेक जण रस्त्यावर येऊन भूमिहीन, बेरोजगार झाले. देशात राबविलेले विकासाचे मॉडेल्सही कमकुवत ठरले. त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर विकासाकडे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक दृष्टिकोनातून पाहून विकासाची संकल्पना सुस्पष्ट होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि प्रगतिशील लेखक संघातर्फे वाङ्मय विचार पर्व या उपक्रम मालिकेत ‘विकास : नेमका कोणाचा, कसा व किती?’ या चर्चासत्राचे आयोजन बजाजनगरातील कस्तुरबा भवनात करण्यात आले. चर्चासत्रात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे म्हणाले, बॅनर तयार करणारे, बांधकाम क्षेत्रातील मजुरांची संख्या कमी होऊन काम मिळत नसल्याने ठिय्यावर मजूरही येत नाहीत. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या न मिळाल्याने अनेक परिवार विनाशाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, विकासात सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्रीय तथ्य तपासण्याची गरज आहे. क्रमबद्ध विकास तळागाळापर्यंत पोहोचतो. यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. मात्र भारतात यावर प्रयत्न कमी पडले. जपानने क्रमबद्ध विकास करून प्रगती साधल्याचे सांगून त्यांनी विविध विकासाच्या मॉडेल्सची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित म्हणाले, व्यवस्थेविषयी सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे. व्यवस्थेतील लोक सर्वांगीण विकास रोखून धरतात. सत्तेशी जुळवून घेणाऱ्यांचा विकास होतो. तळागाळापर्यंत विकास पोहोचविणारी यंत्रणा भ्रष्ट असून, वर्तमानकाळातील परिस्थिती पाहून विकासाची व्याख्या करण्याची गरज आहे. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सगळीकडे बेबंद भांडवलशाही उरली असून, तंत्रज्ञानाला विरोध न करता सामूहिक विकास साधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी संस्कृतीचा परिणाम विकासावर होत असल्यामुळे संस्कृती जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. सुरेश खैरनार यांनी पुनर्वसनासाठी आवाज उचलणाऱ्या चळवळी संपत असल्याची खंत व्यक्त करून, कायद्याच्या भरवशावर नक्षलवाद संपविणे कठीण असल्याचे सांगितले. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी तथाकथित विकासाच्या विरोधातील प्रश्न मांडण्याची लोकशाहीतील जागा हरवल्याचे मत व्यक्त केले. संचालन अजेय गंपावार यांनी केले. (प्रतिनिधी)