शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

सावनेरच्या भाजीबाजारात चिक्कार गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:08 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने रात्रीला संचार तर दिवसा जमावबंदी लागू केली. एवढेच ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने रात्रीला संचार तर दिवसा जमावबंदी लागू केली. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाने साथराेग प्रतिबंध कायद्यान्वये जिल्ह्यातील आठवडी बाजारावर बंदीही घातली आहे. मात्र, सावनेर शहरातील भाजीबाजारात रविवारी (दि. १८) ग्राहकांनी चिक्कार गर्दी बघायला मिळाली. शहरातील मुख्य मार्गावर पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त असताना या भाजीबाजारात नागरिक काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचा फज्जा उडवित मुक्तसंचार करीत हाेते.

विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सावनेर शहर व तालुका काेराेना संक्रमणामध्ये आघाडीवर आहे. काहींनी सर्व नियम धाब्यावर ठेवून शहरात मुक्तसंचार करायला सुरुवात केली आहे. त्यात काही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. त्यातच शहरातील भाजीबाजारात अनेक विक्रेत्यांनी भाजीपाल्यासह इतर वस्तूंची दुकाने थाटली हाेती. ग्राहकांनीही खरेदी करण्यासाठी गर्दी केली हाेती. या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर या बाबी नावालाही दिसत नव्हत्या. त्यामुळे नागरिकांचा हा बेजबाबदारपणा काेराेना संक्रमणास अधिक कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केली.

काेराेना संक्रमणामुळे वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. गरिबांनी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी पदरमाेड करून महागडे फाेन खरेदी केले. त्यातच ग्रामीण भागातील शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झाला. अशी सर्व विपरित परिस्थिती असताना काही नागरिक त्यांचा बेजबाबदारपणा साेडायला तयार नाही. नांदाेगाेमुख व परिसरात काेराेना रुग्ण वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी स्थानिक माेवाडे पब्लिक स्कूलमध्ये साेय करावी, अशी मागणी सरपंच विवेक माेवाडे यांनी केली आहे. या शाळेकडे सात हजार चाैरस फूट क्षेत्रफळ असलेली इमारत आहे. तिथे डाॅक्टर, औषधे, ऑक्सिजन व १०० खाटांची साेय केल्यास अनेकांचे प्राण वाचविल्या जाऊ शकतात, असेही विवेक माेवाडे यांनी सांगितले असून, यासाठी आपण उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना पत्र पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

...

उपचाराविना मृत्यू

ग्रामीण भागात काेराेनाचे संक्रमण वाढत आहे. बहुतांश गावांमध्ये अख्ख कुटुंब पाॅझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहेत. यात काहींचा उपचारादरम्यान तर काहींचा उपचाराविना मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही साखळी आजही कायम आहे. काही नागरिक काेराेनाची लागण झाल्यानंतर डाॅक्टरांवर विश्वास ठेवण्याऐवजी गावठी इलाज करण्यावर भर देत जीव गमावत आहेत. काही नागरिकांचा डाॅक्टरांवर विश्वास असला तरी त्यांच्याकडे महागडी औषधे खरेदी करायला पैसा नाही. असे असतानाही नागरिक त्यांचा बेजबाबदारपणा साेडायला तयार नाहीत.

...

शाळेत उपचाराची साेय करा

तालुक्यातील नांदागोमुख व परिसरात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. अनेकांवर शहरात अथवा दवाखान्यात उपचार करणे शक्य नसल्याने त्यांच्यावर नांदागाेमुख येथील शाळेत उपचाराची सुविधा करावी, अशी मागणी सरपंच विवेक ऊर्फ जगदीश मोवाडे यांनी केली आहे. खासगी हाॅस्पिटलमधील उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर आहे. शहरांमधील शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात उपचाराची साेय निर्माण करणे आवश्यक असल्याचेही विवेक माेवाडे यांनी सांगितले.