शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी लावला सीपींना फोन...

By admin | Updated: August 3, 2015 02:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात.

तक्रारीची घेतली दखल : शहरात दहशतीचे वातावरण नकोनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात. यामुळेच दरवेळी मुख्यमंत्र्यांसमोर गऱ्हाणी मांडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांनी रामगिरीवर गर्दी केली. अशातच एका महिलेने आपल्याला समाजकंटकाकडून त्रास होत असल्याची तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याची दखल घेतली. तातडीने पोलीस आयुक्तांना फोन लावण्याच्या सूचना दिल्या. संबंधित व्यक्तीचा त्वरित बंदोबस्त करा, असे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि महिलेच्या चेहऱ्यावर सीएम आपलेच असल्याचे समाधान झळकले. रविवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्याच्या सूचना हैदराबाद हाऊस येथील सचिवालयाला दिल्या आहेत. त्यामुळे नागपूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रविवारी सुमारे ४५० नागरिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे आपले गऱ्हाणे मांडले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले व शक्य तेवढ्या प्रकरणात यंत्रणेला निर्देश देत तातडीने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना दिवसभर भेटणाऱ्यांमध्ये अपंग संघटनांचे प्रतिनिधी, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी अशा अनेकांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. काहींचे प्रश्न तत्काळ निघाली निघाले. (प्रतिनिधी)सर्वांना येऊ द्या लोक दुरून येतातमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रामगिरीच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचीही मोठी संख्या होती. मात्र, सुरक्षा यंत्रणा सर्वांनाच आत सोडत नव्हती. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वांना आत येऊ देण्याचे निर्देश दिले. ‘सर्वांना येऊ द्या, लोक खूप दुरून येतात. त्यांची कामे आपण केलीच पाहिजे. मोठ्या आशेने ते येतात. त्यांना अडवू नका’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आत बोलावून घेतले. या वेळी रामगिरीत प्रवेश मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.