शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दीपालीच्या आईचा चरितार्थ शिवकुमारच्या उत्पन्नातून करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आराेपी अधिकारी शिवकुमारच्या वेतनातून आणि त्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आराेपी अधिकारी शिवकुमारच्या वेतनातून आणि त्याने जमवलेल्या संपत्तीतून दीपालीच्या आईचा चरितार्थ भागवावा, अशी मागणी ‘जस्टीस फाॅर दीपाली चव्हाण’ अभियानाच्या प्रमुख अरुणा सबाने यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दीपाली यांच्या आई आर्थिकदृष्ट्या दीपाली यांच्यावर अवलंबून हाेत्या. दीपाली यांच्या सुसाईड नाेटवरून ही बाब ठळकपणे लक्षात येते. २०१३च्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत पीडिता किंवा तिच्या कुटुंबियांना आराेपीच्या उत्पन्नातून नुकसानभरपाई देण्याची तरतूद असल्याची बाब सबाने यांनी निवेदनात नमूद केली आहे. संबंंधित विभागाच्या मंत्र्यांनी तशाप्रकारचे आदेश काढावे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर पावले उचलावी. यामुळे पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळेल आणि अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धडा शिकवता येईल. हा आदेश म्हणजे अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये माेठे उदाहरण ठरेल, असे मत सबाने यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, शिष्टमंडळाने वन विभागातर्फे तयार केलेल्या आत्महत्येच्या ९ सदस्यीय चाैकशी समितीवरही आक्षेप घेतला. या समितीतील बहुतांश वन अधिकारी हे श्रीनिवास रेड्डीच्या मर्जीतले आणि स्वयंसेवी संस्था लाभार्थी आहेत. ते दबावाखाली येऊ शकतात. त्यामुळे या घटनेचा तटस्थपणे विचार करणारे, न्याय देणारे निर्भीड सदस्य हवेत. या समितीने रेड्डी व शिवकुमारची चाैकशी साेडून दीपाली यांची चाैकशी चालवली आहे. या समितीतील बहुतांश सदस्य हे आयएफएसच्या मर्जीतील आहेत. पाच - पाच आयएफएस अधिकारी कशासाठी? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, सरकारी वकील, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असावा, अशी मागणी त्यांनी केली.

श्रीनिवास रेड्डी यांना अटक कधी?

दीपालीचा मानसिक आणि शारीरिक छळ जरी प्रत्यक्ष शिवकुमार यांनी केलेला असला, तरी तक्रार करूनही रेड्डींनी दीपालीची मदत केली नाही. उलट शिवकुमारला वारंवार पाठीशी घातले. त्यामुळे या आत्महत्येला शिवकुमार इतकेच निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. मात्र, आत्महत्येला २० दिवस उलटूनही रेड्डी यांना अद्याप अटक झालेली नाही. अचलपूर न्यायालयानेही रेड्डीचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही अद्याप रेड्डीला अटक का केली नाही, असा प्रश्नही सबाने यांनी उपस्थित केला. अनेक सबळ पुरावे रेड्डीच्या विरुद्ध असूनही रेड्डीला अमरावतीचे पोलीस अधीक्षक वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत की काय, अशी शंका येते. त्यामुळे ही चौकशी अमरावती पोलिसांकडून काढून घेण्यात यावी, अशीही मागणी केली.