शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरवर स्थलांतरितांचे ओझे !

By admin | Updated: July 11, 2014 01:25 IST

११ जुलै १९८७ रोजी जगात ५ अब्जावे अपत्य जन्माला आले; तेव्हापासून हा दिवस विश्वलोकसंख्या दिन म्हणून जगभर पाळला जातो. १९८७ ते २०११ पर्यंत विश्वलोकसंख्या २ अब्जाने वाढली.

आज जागतिक लोकसंख्यादिन : वाढतोय आलेखनागपूर : ११ जुलै १९८७ रोजी जगात ५ अब्जावे अपत्य जन्माला आले; तेव्हापासून हा दिवस विश्वलोकसंख्या दिन म्हणून जगभर पाळला जातो. १९८७ ते २०११ पर्यंत विश्वलोकसंख्या २ अब्जाने वाढली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. आपले नागपूरही त्याला अपवाद नाही़ २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याच्या लोकसंख्येत १४.३९ टक्के वाढ झाली आहे़ १४ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार १७१ इतकी आहे़ यातील नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ९११ इतकी आहे़ एका अहवालानुसार बाहेरच्या राज्यातून पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या चार शहरातही मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. त्याचाही लोकसंख्या वाढीवर परिणाम होत असून, शहराचा आकार वाढत चालला आहे़ भारतात जनगणनेला १३० वर्षांचा इतिहास आहे. भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुधर्मीय देशातील नागरिकांची सांख्यिकीय माहिती गोळा करण्याचे हे एकमेव माध्यम आहे. १८७२ पासून दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. यात अद्याप खंड पडला नाही. २०११ मध्ये करण्यात आलेली जनगणना ही देशातील १५ वी जनगणना होती. या जनगणनेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. २००१ मध्ये ती ९,६८,७८,६७२ होती. २००१ ते २०११ या काळात लोकसंख्येत १,५४,९४,३४५ ने वाढ झाली. लोकसंख्येत पहिला क्रमांक ठाणे जिल्ह्याचा लागतो. नागपूर जिल्हा ९ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ४६,५३,१७१ असून, त्यात २३,८८,५५८ पुरुष आणि २२,६४,६१३ महिलांचा समावेश आहे. १९०१-१९११ ते २००१-२०११ या कार्यकाळात नागपूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीच्या दरात चढउतार पाहायला मिळतो. १९०१ ते ११ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ७.७२ टक्के होता. पुढच्याच दशकात म्हणजे १९११-२१ या काळात तो उणे २.०३ पर्यंत खाली आला. त्यानंतर १९२१ ते ३१ या दशकात त्यात पुन्हा वाढ होऊन १८.६१ टक्के झाला. १९३१-४१ या दशकात कमी (१२.७६) झाला. १९४१ -५१ या दशकात पुन्हा वाढला (१६.७६). १९५१ ते १९८१ या काळात लोकसंख्या वाढीचा आलेख चढताच होता. १९८१ मध्ये ३३.२६ टक्के वाढ नोंदवली गेली. १९८१-९१ या दशकात पुन्हा घट(२६.९७) झाली.१९९१-२००१ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर २३.७४ होता २००१-२०११ मध्ये तो १४.३९ झाला. लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे काही प्रमाणात नागपुरातील स्थानिक लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आले असले तरी बाहेरून येऊन येथे स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे़ नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडल इंटरनॅशनल हब) निर्मिती होत आहे. हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा बनणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई, पुण्यानंतर नागपूर शहराला राज्यात विशेष स्थान प्राप्त होणार आहे़ म्हणूनच या शहराचे आकर्षण वाढत असून नागपुरात स्थायिक होणाऱ्यांचा आलेखही वेगाने विस्तारत आहे़ (प्रतिनिधी)